narendra Modi 
महाराष्ट्र बातम्या

'मोदी खोटारडे हे आज पुन्हा एकदा सिद्ध'

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी किती खोटारडे आहेत हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. नाशिकच्या सभेत मोदींनी शरद पवारांबाबत चूकीची माहिती जनतेला दिली, असे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या समारोप नाशिकमध्ये झाला. या यात्रेच्या समारोपाला मोदी उपस्थित होते. काँग्रेसचे कन्फ्युजन मी समजू शकतो. मात्र, शरद पवारांसारखे अनुभवी नेते पाकिस्तानबद्दल असे बोलतात. शरद पवारांना शेजारचा देश चांगला वाटतो. तेथील राजकारणी त्यांना कल्याणकारी वाटतात, असे मोदींनी शरद पवारांबद्दल वक्तव्य केले होते.
 


याविषयी ट्विट करताना मलिक यांनी म्हटले आहे, की पवारांनी स्पष्ट सांगितले होते की पाकिस्तानातील राज्यकर्ते, सैन्य भारताविरुद्ध कुरघोडी करतात. मात्र मोदींनी साहेबांचे वाक्य फिरवून सांगितले. पंतप्रधान मोदी यांनाच पाकिस्तानचा जास्त पुळका आहे म्हणून २०१४ला नवाज शरीफांशिवाय त्यांना शपथ घेणे अवघड झाले होते. पुळका आहे म्हणूनच प्रोटोकॉल मोडत मोदी पाकिस्तानात बिर्याणी खायला गेले होते पवारांबाबत जो अपप्रचार मोदी करत आहेत तो सिद्ध करावा अन्यथा  वक्तव्याबाबत माफी मागावी.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Manikrao Kokate latest News : माणिकराव कोकाटेंना कोणत्याही क्षणी अटक होणार ; राजीनामा अजित पवारांनी स्वीकारला

Latest Marathi News Live Update : दिव्यांग व्यक्तींच्या विवाहास शासनाचे प्रोत्साहन

Ishan Kishan : १० षटकार, ६ चौकार! इशान किशनचे वादळी शतक; अभिषेक शर्माच्या विक्रमाशी बरोबरी, पूर्ण केल्या ५०० धावा

31 Dec Deadline alert : ३१ डिसेंबर शेवटची संधी!, बँक अन् ‘आधार’शी संबंधित 'ही' महत्त्वाची कामे केली नाहीत, तर पडेल महागात!

'एक दो तीन' गाण्यावेळी माधुरी दीक्षितसोबत नक्की काय घडलं? की, सरोज खान वैतागून म्हणाल्या...'तू घरी जा...'

SCROLL FOR NEXT