NCP Ajit Pawar on bjp involvement in maharashtra political crisis eknath shinde  esakal
महाराष्ट्र बातम्या

एकनाथ शिंदेंच्या बंडामागे भाजपाचा हात? अजित पवारांचं तीन शब्दात उत्तर

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेच्या अडचणी वाढल्या आहेत, यादरम्यान महाविकास आघाडी सरकार देखील धोक्यात आलं आहे, यादरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या पार्श्वभूमीवर आमचा प्रयत्न महाविकास आघाडी टिकवण्यसाठी असणार आहे असे सांगितले आहे. या बंडामागे भाजप असल्याचे अजून दिसत नाही असे देखील अजित पवार म्हणाले आहेत.

अजित पवार महाविकास आघाडीचे सरकार टिकवण्यासाठी उद्धव ठाकरेंना पूर्णपणे पाठिंबा असून, राज्यातील सरकार टिकवण्यासाठी प्रयत्न करत राहू हे देखील स्पष्ट केलं आहे.

तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी एकनाथ शिंदेच्या बंडामागे भाजप असल्याचं अजून तरी दिसून येत नाही असे देखील स्पष्ट केलं. कॉंग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलेल्या आरोपांवर बोलताना पवार म्हणाले कीस, निधी वाटपात कोणताही दुजाभाव केला नाही. सराकार टिकवण्याची जबाबदारी सर्वच पक्षांची आहे आणि एकनाथ शिंदेसोबतचे आमदार स्वखुशीने गेले की बळजबरीने हे शोधावे लागेल असे देखील त्यांनी यावेळी सांगितलं.

आमचा प्रयत्न महाविकास आघाडी टिकवण्यसाठी असणार असून, कायमच राष्ट्रवादीचा पाठिंबा शिवसेनेला असेल असे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. एकनाथ शिंदेंच्या या बंडामागे भाजपचा हात आहे असा प्रश्न अजित पवारांना विचारला असता ते म्हणाले की, या बंडामागे सध्यातरी भाजपच्या कोणत्या मोठ्या नेत्याचा हात दिसून येत नाहीये.

काहीवेळापूर्वी नाना पटोले यांनी केलेल्या निधीबाबतच्या वक्तव्यावर अजित पवार म्हणाले की, आमच्या मित्रपक्षांकडून निधीबाबत काही आरोप केला जात आहेत, पण मी निधीसाठी कुणामध्ये दुजाभाव केला नाही. सरकार टिकवण्याची जबाबदारी तिन्ही पक्षांची आहे. पण त्यांनी तसं वक्तव्य का केलं हे माहिती नाही. राऊतांनी अगोदर महाविकास आघाडी २५ वर्षे टिकेल असं सांगितलं होतं. त्यानंतर राऊतांनी आज वेगळं विधान केले आहे. त्यामुळे राऊतांच्या विधानासारखं उद्धव ठाकरेंच्या मनात काही आहे का, हे आम्ही विचारू, असेही अजित पवार यांनी सांगितले.

आम्ही सर्वांनी मिळून ठाकरेंना मुख्यमंत्रीपदी बसवलं आहे. आमदारांना परत आणण्यासाठी राऊत तसं बोलले असावेत. मात्र, याबाबत आम्ही उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार असल्याचं ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांच्या बंडात अजूनतरी भाजपचा रोल दिसत नसल्याचं ते म्हणाले.

एकनाथ शिंदे यांच्यासोबत आमदार स्वखुशीने गेले की, बळजबरीने गेले ते शोधावं लागेल असेही अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले. अजित पवार यांनी शिवसेना आणि काँग्रेसच्या आमदारांना निधी देत नव्हते त्यामुळे शिवसेना आमदार नाराज झाले आहेत असा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केला होता. त्यावर मी कधीच कोणत्या आमदाराला कमी निधी दिला नाही, कुणासोबतच भेदभाव केला नसल्याचे अजित पवार यांनी यावेळी स्पष्ट केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

बाप से बेटा सवाई! छोट्या किंग खान आर्यनचा व्हिडिओ पाहिला का? आवाज, दिसणं आणि स्टाइल सगळं काही तेच, व्हिडीओ होतोय व्हायरल

SCROLL FOR NEXT