Untitled-2.jpg
Untitled-2.jpg 
महाराष्ट्र

अजून एक आमदार परतणार : नवाब मलिक

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : कालपासून घडत असलेल्या राजकीय घटनांमुळे राज्यात खळबळ उडाली आहे. काल सकाळी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रीपदाची व अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ
घेतली. काही काळातच ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी सांगितले की, हा अजित पवार यांचा वैयक्तीक निर्णय आहे. या निर्णयाशी पक्षाचा काहीही संबंध नाही. यामुळे एक चित्र स्पष्ट झाले की, अजित पवार यांनी पक्षाविरूद्ध काही आमदारांना घेऊन बंड केले. शरद पवार व उद्धव ठाकरे यांची संयुक्त प्रेस काॅन्फरन्स झाल्यानंतर अजित पवार यांच्या सोबत गेलेले एक-एक आमदार शरद पवार यांच्याकडे येऊ लागले. आज प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्टिट करत अजून एक आमदार लवकरच परतेल असे सांगितले आहे.

दरम्यान, या आमदारांना शपथ विधीबाबत कसलीच कल्पना न देता राजभवनावर घेऊन गेल्याचा आरोप राष्ट्रवादीने केला आहे. तसेच आमदारांनी देखील चुकीची माहिती देऊन आपल्याला तिथे घेऊन गेल्याचे सांगितले आहे. तसेच या आमदारांनी आपला शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचे सांगितले. अजित पवार यांच्या बरोबर गेलेल्या 12 आमदारांपैकी 8 आमदार परतले आहेत, असे अधिकृतरित्या पक्षाचे नेते छगन भुजबळ यांनी आज सकाळी सांगितले.

मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवार यांच्याकडे चार आमदार असून, ते देखील लवकरच पक्षाकडे येतील असे एका नेत्याने नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.  तसेच आज प्रवक्ते नवाब मलिक यांनी व्टिट करत अजून एक आमदार लवकरच परतेल असे सांगितले आहे. त्यामुळे आता अजित पवार यांच्यासोबत एकतरी आमदार राहणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi: निवडणुकीत पाकिस्तानची एन्ट्री! 'राजकुमाराला पंतप्रधान बनवण्यास पाकिस्तान आतुर', मोदींचा राहुल यांच्यावर निशाणा

Ankita Lokhande : "तिला स्टुडंट ऑफ द इयर 3ची ऑफर मिळालीच नव्हती"; अफवांवर अंकिताच्या टीमकडून स्पष्टीकरण

Latest Marathi News Live Update : “लव्ह जिहाद, भू जिहादनंतर आता व्होट जिहाद”, पंतप्रधान मोदींचा काँग्रेसवर टीका

Akshaya Tritiya 2024 : कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

Lok Sabha Election: उन्हाचा कहर वाढला! निवडणूक आयोग सतर्क, बिहारनंतर या राज्यातही मतदानाची वेळ वाढवली

SCROLL FOR NEXT