Sharad Pawar 
महाराष्ट्र बातम्या

केंद्राच्या निर्णयावर संशय, सत्य बाहेर येईल या भीतीमुळे : शरद पवार

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : केंद्र सरकारने कोरेगाव-भीमाचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे (एनआयए) सोपविण्याचा निर्णय संशयास्पद आहे. सत्य बाहेर येऊ नये, म्हणून केंद्र सरकारने घाई केली, असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले आहे.

कोरेगाव-भीमा प्रकरणाची विशेष तपास पथकाद्वारे (एसआयटी) चौकशी करण्याची मागणी राज्यामध्ये जोर धरत असतानाच केंद्र सरकारने अचानक तडकाफडकी निर्णय घेत हे प्रकरण राष्ट्रीय तपास संस्थेकडे (एनआयए) वर्ग केले. हे करण्याआधी महाराष्ट्र सरकारला विश्‍वासात घेण्यात आले नाही. त्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून केंद्राच्या निर्णयावर टीका करण्यात येत आहे. याविषयी आज (शनिवार) शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत भूमिका मांडली.

शरद पवार म्हणाले, की माजी न्यायमूर्ती पी. बी. सावंत हे एल्गार परिषदेला जाणार होते. पण, ते प्रकृती अस्वस्थामुळे जाऊ शकले नाहीत. अन्याय, अत्याचाराविरोधात भावना व्यक्त करणारी त्या परिषदेतील भाषणे होती. या प्रकरणाचा तपास करणाऱ्यांनी कधीच माओवादी आहेत, असे म्हटलेले नाही. अन्यायाविरोधात बोलणे म्हणजे नक्षलवाद नाही. सत्य बाहेर येण्यासाठी एनआयटी स्थापन करण्याची मागणी मी केली होती. या गोष्टीची मागणी केल्यानंतर काही तासांतच केंद्र सरकारने याची चौकशी एनआयएकडे दिली. राज्य सरकारचा अधिकार असताना त्यांच्याकडून घाईघाईने केस काढली. याचा अर्थ अनेक अधिकाऱ्यांनी अधिकाराचा गैरवापर केला. हे सर्व उघड होईल म्हणून हा उद्योग केला आहे. कायदा व सुव्यवस्थेची जबाबदारी राज्य सरकारची आहे. कविता वाचणे हा नक्षलवाद नाही. समाजातील अत्याचाराविरोधात बोलल्याबद्दल नक्षलवादी ठरविण्यात आले. याची चौकशी करणे गरजेचे आहे. पोलिस अधिकाऱ्यांनी काय उद्योग केले, याची चौकशी राज्य सरकारने केली पाहिजे. केंद्राचा चौकशीमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार नसतो आणि केलाही नाही पाहिजे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

Latest Maharashtra News Updates : पुण्यात मुसळधार पाऊस; बाणेर-औंध रस्ता वाहतुकीसाठी अजूनही ठप्प

Malkapur Accident : भरधाव मारुती इको कारची समोर चालणाऱ्या ट्रेलरला पाठीमागून जोरदार धडक; ५ जणांचा मृत्यू , ४ जण गंभीर जखमी

Chikhali Accident : शिक्षक आमदाराच्या गाडीने तरुणास उडविले; तरुण गंभीर जखमी होऊन सध्या कोमात

SCROLL FOR NEXT