NCP Political Crisis Esakal
महाराष्ट्र बातम्या

NCP Crisis : अजित पवार गटाच्या त्या खेळीने वाढणार शरद पवारांचं टेन्शन? सुप्रीम कोर्टात...

या प्रकरणी आज सर्वोच्च न्यायालयात सुनाणवी पार पडणार आहे.

रोहित कणसे

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट पडल्यानंतर अजित पवार गट आणि शरद पवार गटात पक्ष आणि निवडणूक चिन्हासाठी संघर्ष सुरू आहे. याप्रकरणाची सुनावणी केंद्रीय निवडणूक आयोगात सुरू आहे. यादरम्यान आमदार अपात्रतेच्या याचिकेवर निर्णय घेण्यास विधानसभा अध्यक्ष दिरंगई करत असल्याने या प्रकरणात हस्तक्षेप करावा यासाठी ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. यावर आज सुनावणी होणार आहे.

दरम्यान ठाकरे गट आणि शरद पवार गटाच्या या याचिकेवरील सुनावणी एकत्रितपणे होणार आहे. यादरम्यान या सुनावणीआधीच अजित पवार गटाने मोठी खेळी खेळली आहे. अजित पवार गटाकडून सर्वोच्च न्यायालयात तीन हस्तक्षेप याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. नरहरी झिरवळ, छगन भुजबळ आणि अनिल पाटील यांच्या वतीने याचिका दाखल करण्यात आल्या आहेत.

सुप्रीम कोर्टात दाखल झालेलं आमदार अपात्रतेचं प्रकरण विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर विरुद्ध जयंत पाटील यांच्यात आहे. त्यामुळे आम्हाला या प्रकरणात आमचं म्हणणं मांडण्यासाठी पुरेसा वाव मिळत नाही. आम्हाला आमचं मत मांडायचं असून ते ऐकून घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नका, अशी विनंती देखील अजित पवार गटाकडून कोर्टात करण्यात आली आहे.

दरम्यान, अजित पवार गटाचे दाखल केलेल्या या तीन हस्तक्षेप याचिका कोर्टाने स्वीकारल्या, तर त्यांच्या वतीने 3 वकील बाजू मांडणार आहेत. त्यामुळे न्यायालय या प्रकरणात का निर्णय देतं याकडेच सर्वांचं लक्ष लागून आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT