महाराष्ट्र

'राष्ट्रवादी'चं कसं आहे.. बैल गेला; झोपा केला! 

संजय मिस्कीन

राष्ट्रवादी कॉंग्रेसने आज युवक प्रदेशाध्यक्षपदी मेहबूब शेख व त्यांच्या जोडीला दोन कार्याध्यक्ष म्हणून रविकांत वरपे व सूरज चव्हाण यांच्या नेमणुका केल्या. खरेतर लोकसभेसारखे मोठे आव्हान समोर असताना व देशभरात युवक हा बदलत्या राजकारणाचा मुख्य घटक बनलेला असताना राष्ट्रवादीतले आपमर्जीचे राजकारण मात्र बदलायचे धाडस करत नव्हते. तत्कालीन युवक प्रदेशाध्यक्ष संग्राम कोते-पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर जवळपास तीन महिने हे पद रिक्त होते. त्यातच लोकसभेचे शिलंगण आटोपल अन्‌ पराभवाने या पक्षाचे घोडे लगडे झाले. आता विधानसभेला जेमतेम शंभर दिवस उरलेले असताना "राष्ट्रवादी'ने या तीन युवकांवर युवा आघाडीची धुरा सोपवली आहे. 

खरेतर हे तिन्ही युवक सामान्य घराण्यातील आहेत. पक्षाची विचारधारा भक्कमपणे मांडणारे आहेत; पण लोकसभेच्या अगोदर त्यांना पक्षाने वंचितच ठेवले. राष्ट्रवादीतल्या नेमणुका या नेत्यांची मर्जी व गटबाजीचं वर्चस्व या दुष्टचक्रातून बाहेर पडत नाहीत, अस मानले जाते. युवक आघाडीचेही तसेच झाले आहे.

देशात व राज्यात भारतीय जनता पक्ष, शिवसेना युवा आघाडी भक्कम बांधत असताना, पक्षसंघटनेत युवा चेहरे पुढे करत असताना कॉंग्रेस व राष्ट्रवादीत मात्र युवा चेहऱ्यांना नेतृत्वाची फारशी संधी मिळत नाही. मिळालीच तर ती नेत्यांच्या घराण्यातील युवकांना वारसा हक्कानेच लाभते, असा या पक्षातील युवकांचा समज झाला होता. या तिन्ही युवकांच्या माध्यमातून हा समज काढून टाकण्याचा प्रयत्न म्हणून याकडे सकारात्मक निर्णय म्हणून पाहिले जाईल; पण लोकसभा निवडणुकीतून आलेले नैराश्‍य अन विधानसभेसाठीचा उरलेला अल्प कालावधी पाहता "बैल गेला अन झोपा केला' असेच या निवडीकडे पाहिले जाणार नाही, याची काळजी घ्यायला हवी. पक्षातील युवा आघाडीतलं नैराश्‍य दूर करण्याचे मोठं व पहिलं आव्हान या तिघांच्या समोर आहे. शाळा-महाविद्यालये सुरू होत असल्याने युवकांचे संघटन मजबूत करण्याची संधी आहेच; पण तालुकास्तरावर या तिघांना युवक संघटन नव्या जोमानं उभं करावे लागेल. 

मेहबूब शेख हा स्वकर्तृत्वार उभा राहत असलेला युवा चेहरा आहे. बीडमधील चारा छावण्यांचा सावळागोंधळ या युवकाने जिगरीनं उघडा केला होता. उत्तम वक्ता व पक्की विचारधारा हे त्याचे गुण. रविकांत वरपे तर मजुरी करणाऱ्या पित्याच्या घरात जन्मलेला मुलगा. सामाजिक कार्य व समविचारी युवकांचे संघटन हा त्याचा पिंड. राष्ट्रवादीच्या मीडिया सेलची ही त्याने जबाबदारी सांभाळली हा अनुभव. सूरज चव्हाणदेखील लातूर जिल्ह्यातील सामान्य कुटुंबातलाच. सध्या पक्षाच्या मुख्यालयात समन्वयकाची जबाबदारी सांभाळतो तो. या सामान्य घरातल्या युवा चेहऱ्यांना राष्ट्रवादीने संधी दिली; पण आव्हाने मोठी आहेत. त्यांना मोकळेपणानं काम करण्याची संधी दिली तर युवा आघाडीत सकारात्मक बदल दिसू शकतात; पण केवळ त्यांना शोभेचं बाहुलं करून पक्षातील घरंदाज युवा नेत्यांच्या सावलीत उभे राहायची वेळ आल्यास परत "मागच्या पानावरून पुढे' अशी अवस्था कायम राहणार नाही, याची दखल घ्यायला हवी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT