Ajit Pawar esakal
महाराष्ट्र बातम्या

Ajit Pawar: 'जे वाजपेयी-अडवाणींना जमलं नाही ते...' अजित पवारांकडून पंतप्रधान मोदींचं कौतुक

रुपेश नामदास

सकाळ माध्यम समूहाच्या वतीने चिंचवडमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये अजित पवार यांची मुलाखत घेण्यात आली. संपादक सम्राट फडणीस यांनी ही मुलाखत घेतली. यावेळी पवारांनी राजकारण, समाजकारण, अर्थकारण, शेती या विषयावर मनमोकळ्या गप्पा मारल्या.

यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे जोरदार कौतुक केले. 2014 आणि 2019 मध्ये भाजपला केवळ पंतप्रधान मोदींमुळेच विजय मिळाला म्हणतात मोदींवर कौतुकाचा वर्षाव केला.

सकाळच्या दिलखुलास कार्यक्रमात अजित पवार म्हणाले की, नरेंद्र मोदींचा करिष्मा आहे. अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, मुरली मनोहर जोशी यांना जे शक्य नव्हते ते नरेंद्र मोदींनी केले.

1984 नंतर देशात पहिल्यांदा 2014 मध्ये पूर्ण बहुमताने सरकार स्थापन झाले. यूपीए सरकारच्या काळात सोनिया गांधी, मनमोहन सिंग यांना सरकार स्थापनेसाठी इतर दोघांचा पाठिंबा घ्यावा लागला, पण २०१४ मध्ये मोदींनी आपला करिष्मा दाखवला.

अजित पवार पुढे म्हणाले की, या गोष्टीकडे दुर्लक्ष करता येणार नाही, पण आता त्यांच्या नंतर कोण येणार असा प्रश्न पडला असताना दुसरे नाव दिसत नाही.

दरम्यान यावेळी अजित पवार यांना विचारण्यात आलं की, २००४ मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदाची संधी होती. त्यावर अजित पवार म्हणाले की, २००४ मध्ये काँग्रेसपेक्षा आमच्या जागा अधिक आल्या होत्या. त्यावेळी आम्हाला संधी होती.

तेव्हा आम्ही आर.आर. पाटलांना विधीमंडळ नेता म्हणून निवडले होते. त्यामुळे सहाजिकच मुख्यमंत्री आर.आर. पाटील झाले असते. मात्र हे दिल्लीतून ठरलं होतं, असंही ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MSRTC Fine: एसटी बस चुकीच्या ठिकाणी थांबवली तर कर्मचाऱ्यांच्या पगारातून दंड वसूल करणार! MSRTC चा मोठा निर्णय, काय कारवाई होणार?

१६ वर्षांखालील मुलांच्या सोशल मीडिया वापरावर बंदी, पंतप्रधानांनी घेतला मोठा निर्णय, नेमकं काय सांगितलं?

२७ वर्षीय महसूल सहाय्यक तरुणीवर हल्ला करणाऱ्याला अटक, विष प्राशन करत दोनदा स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न; उपचार सुरू

Mumbai Loal: मध्य आणि हार्बर रेल्वे जोडली जाणार, कर्जत-कसाराहून थेट वाशी-बेलापूर गाठता येणार; लोकल कधीपासून सुरू होणार?

Latest Marathi News Live Update : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढील सुनावणी 17 जूनला होणार

SCROLL FOR NEXT