महाराष्ट्र

Jayant Patil l अनेकांनी पक्ष सोडला तरीही राष्ट्रवादी उभा-जयंत पाटील

सकाळ डिजिटल टीम

सोलापूर: ज्यांनी आयुष्य राष्ट्रवादीसोबत काढले, ते शेवटच्या क्षणी सोडून गेले. मंत्री होणे काहींच्या नशीबात नसेल तर त्याला आपण काय करणार? अनेकांना आज प्रचंड दुःख होत आहे. हे लोक पक्ष सोडून जातील तर पक्ष संपेल असं त्यांना वाटत होतं, मात्र पक्ष सावरून उभा राहीला असे वक्तव्य प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी केले. राष्ट्रवादी (NCP) परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वाच्या आज तिसऱ्या दिवशी बार्शी (Barshi) विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत वैराग (Vairag) येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला.

ज्यांनी आयुष्य राष्ट्रवादीसोबत काढले, ते शेवटच्या क्षणी सोडून गेले. मंत्री होणे काहींच्या नशीबात नसेल तर त्याला आपण काय करणार?

वैराग नगरपंचायतीमध्ये तुम्ही पक्षाला सत्ता दिली आहे. या भागाचा विकास करण्यासाठी कुठेच कमतरता पडू देणार नाही, तसेच कोणताही निधी कमी पडू देणार नाही. आपण सर्वांनी २०२४ वर लक्ष ठेवून काम करावे. २०२४ साली राष्ट्रवादीचाच झेंडा इथे फडकेल यासाठी जय्यत तयारी करा असे आवाहन यावेळी जयंत पाटील यांनी केले.

पुढे ते म्हणाले, २०१९ साली अनेक जण पक्षाला सोडून गेले. आता काही राष्ट्रवादी सत्तेत येत नाही, ही भावना या लोकांच्या मनात होती. मात्र आदरणीय खा. शरद पवार (Sharad Pawar) साहेबांच्या मार्गदर्शनाने राष्ट्रवादीने पुन्हा भरारी घेतली असेही जयंत पाटील म्हणाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Naseem Khan: नसीम खान यांची नाराजी दूर करण्यात काँग्रेसला यश? पुण्यात धंगेकरांच्या प्रचारासाठी लावली हजेरी

MI vs KKR Live IPL 2024 : मुंबईच्या गोलंदाजांची कमाल, केकेआरला पॉवर प्लेमध्येच दिले चार धक्के

Rohit Sharma MI vs KKR : टी 20 वर्ल्डकपचा संघ जाहीर होताच मुंबईच्या प्लेईंग 11 मधून रोहितचं नाव गायब, काय आहे कारण?

Pune Loksabha election 2024 : ''आरक्षणाच्या पन्नास टक्क्यांच्या मर्यादेबद्दल मोदींनी भूमिका जाहीर करावी, आमचं ठरलंय...'' राहुल गांधी स्पष्टच बोलले

Latest Marathi News Live Update : मोदी आता ओबीसी असल्याचं सांगत नाहीत- राहुल गांधी

SCROLL FOR NEXT