NCP Jitendra Awhad On ink thrown on BJP chandrakant patil maharashtra News  esakal
महाराष्ट्र बातम्या

Jitendra Avhad: बीडच्या सभेत जितेंद्र आव्हाडांची संभाजी भिडेंवर जोरदार टीका

शरद पवारांनी बुधवारी पत्रकार परिषद घतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप आणि मोदी सरकारवर ताशेरे ओढले होते.

सकाळ डिजिटल टीम

शरद पवारांनी बुधवारी पत्रकार परिषद घतली होती. या पत्रकार परिषदेत त्यांनी भाजप आणि मोदी सरकारवर ताशेरे ओढले होते. त्यानंतर गुरुवारी त्यांनी बीडमध्ये सभा घेतली. या सभेत जितेंद्र आव्हाड देखील उपस्थित होते.

आव्हाडांनी यावेळी बोलताना शिवप्रतिष्ठाणचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर कठोर शब्दात टीका केली आहे. जितेंद्र आव्हाडांनी यावेळी भिडेंचे संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वराबद्दल असलेल्या मताबद्दल वक्त्यव्य केलं.

शरद पवारांनी बीडमध्ये घेतलेल्या सभेत जितेंद्र आव्हाडांनी यांनी संभाजी भिडेंबद्दल वक्तव्य केले. आव्हाड म्हणाले की, "ज्या मनूने मनूस्मृती लिहिली. त्या मनूपेक्षा संत तुकाराम आणि ज्ञानेश्वर छोटे आहेत.ज्या तुकारामाच्या आणि ज्ञानेश्वराच्या विचाराने महाराष्ट्र घडवला तो विचार त्याला मान्य नाही. आणि हा भिडे त्यांचा गुरुजी आहे. एकीकडे मोदी म्हणतात हर घर तिरंगा आणि दुसरीकडे भिडे म्हणतो फाड दो तिरंगा."

यापुढे आव्हाड म्हणाले की, "सध्या उलट सुलट राजकाराण महाराष्ट्रात सुरु आहे.या राजकारणाचा ताबा आपण घेतला पाहिजे."

शिवप्रतिष्ठाणचे संस्थापक संभाजी भिडे आपल्या वादग्रस्त विधानामुळे नेहमीचं चर्चेत असतात. नुसतचं त्यांनी महत्मा गांधी आणि महात्मा फुलेंबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. याआधी देखील त्यांनी असे की विधानं केले होते, ज्यामुळे महाराष्ट्रात वाद निर्माण झाला होता. त्यांनी मनूस्मृती लिहिणाऱ्या मनूंबद्दल देखील वक्तव्य केलं होतं, ज्यामुळे त्यांच्यावर मोठ्या प्रमाणात टीका झाल होती. (Latest Marathi News)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune News: पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली! भामा आसखेड धरण निम्म्याहून अधिक फुल्ल; आकडेवारी समोर

Water Level: अडाण जलाशयाच्या पाणीसाठ्यात आठवड्याभरात चार टक्क्यांनी वाढ;४५.७५ टक्के जलसाठा

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Tanisha Kotecha : नाशिकच्या तनिषा कोटेचाचे आशियाई टेबल टेनिस स्पर्धेत शानदार यश

HPCL Recruitment 2025: हिंदुस्तान पेट्रोलियमकडून 2.80 लाख पगाराची नोकरी! 300 हून अधिक जागा; जाणून घ्या अर्ज कसा करावा

SCROLL FOR NEXT