Jitendra Awhad Esakal
महाराष्ट्र बातम्या

Jitendra Awhad : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर जितेंद्र आव्हाड ठाम

राज्यात गेल्या काही दिवसांपासून महापुरुषाबद्दल होणारी वक्तव्य आणि वाद मोठ्या प्रमाणावर वाढला

सकाळ डिजिटल टीम

राज्यात गेल्या काही दिवसांपासून महापुरुषाबद्दल होणारी वक्तव्य आणि वाद मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसून येत आहे. काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी संभाजी महाराज यांच्याबद्दल एक वक्तव्य केलं त्यानंतर विरोधक पुन्हा सक्रिय झाले आणि त्यामुळे वाद वाढला तर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही अजित पवार यांच्या व्यक्तव्याला जोडून एक वक्तव्य केलं त्यानंतर पुन्हा वादाला तोंड फुटलं आहे.

दरम्यान “छत्रपती संभाजी महाराजांना आम्ही पहिल्यापासूनच स्वराज्यरक्षक म्हणतो. ते संगमेश्वरला सरदेसाईंच्या वाड्यात होते. ही बातमी औरंगजेबाला कुणी दिली? इथेच तर खरा इतिहास आहे. छत्रपती संभाजी महाराजांना बहादुरगडावर नेण्यात आलं तिथे त्यांचे डोळे काढण्यात आले. त्या ठिकाणी बाजूला विष्णूचं मंदिर आहे.

औरंगजेब क्रूर आणि हिंदूद्वेष्टा असता तर त्याने विष्णूचं मंदिरही फोडलं असतं. तिथून छत्रपती संभाजीराजेंना तुळापूरला नेण्यात आलं. त्यानंतर पुढे काय झालं तो इतिहास सगळ्यांनाच माहित आहे. त्यामुळेच मी म्हणतो आहे की उगाच नको त्या इतिहासात जाऊ नका. इतिहास वाद वाढवतो,” असं जितेंद्र आव्हाड प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हणाले होते. त्यांच्या याच विधानावरुन वाद निर्माण झाला आहे. त्यावरून आज सत्ताधाऱ्यांनी विरोधकांना घेरण्याचा प्रयत्न केला त्यानंतर पुन्हा एकदा जितेंद्र आव्हाड यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

जितेंद्र आव्हाड बोलताना म्हणाले की, मी माझ्या विधानावर ठाम आहे. मी जो प्रश्न केला त्यावर उत्तर मला कोणी दिलं नाही. औरंगजेब क्रूर होता. त्यांनी भावाला मारलं, बापाला मारलं मला सगळं मान्य आहे. पण त्याच्यासमोर महाराष्ट्र झुकला नाही. शिवाजी महाराज झुकले नाहीत. संभाजी महाराज झुकले नाहीत. शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं त्याच रक्षण संभाजी महाराज यांनी केलं. म्हणून ते स्वराज्यरक्षक होते. ते स्वराज्यरक्षक होते त्यामुळं त्यांना एका धर्माशी जोडण्याचं काही कारण नाही. असा कोणताही उल्लेख इतिहासात नाही असं आव्हाड म्हणाले आहेत.

महाराजांचा तसा कोणता उल्लेख असता तर संभाजीराजे यांना सावरकरांनी आणि गोळवलकरांनी त्यांना स्त्रीलंपट आणि दारुड्या असं म्हणण्याचं कारणच नव्हतं. आणि हा दाखला मी नाही तर इतिहासात त्यांच्या पुस्तकात आहे. तेव्हा आपल्या अंगावर आलं की दुसऱ्यावर ढकलून द्यायचं. ही कामं नेहमीच असतं असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Subhanshu Shukla meet PM Modi : शुभांशू शुक्ला यांनी पंतप्रधान मोदींना दिली ‘ती’ खास भेटवस्तू ; जाणून घ्या, मोदी काय म्हणाले?

Nanded Rain : मुखेडमध्ये ३०० जणांना वाचविले; नांदेडमध्ये पावसाचा धुमाकूळ, ९ जण बेपत्ता, म्हशींसह ७० जनावरे गेली वाहून

Eleventh Admission : अकरावीच्या ‘सर्वांसाठी खुल्या’ फेरीअंतर्गत प्रवेशासाठी २२ ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

Pune News : नेत्यांची वेळ न मिळाल्याने पुण्यातील उड्डाणपुलांचे उद्‍घाटन रखडले

इतिहासाची अमूल्य खुण भारतात! इतिहासाशी पुन्हा जोडणारा क्षण, मुख्यमंत्री फडणवीसांची भावनिक प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT