Politics
Politics esakal
महाराष्ट्र

Politics: अखेर राज्य सरकार झुकलं! कांदा प्रश्नावर राष्ट्रवादीच्या आमदाराचं ट्विट चर्चेत

रुपेश नामदास

राज्यात गेल्या काही दिवसांपासून कांदा प्रश्न चांगलाचा गाजत आहे, कवडीमोल भावाने कांद्याची विक्री करावी लागत असल्यामुळे शेतकरी प्रचंड आक्रमक झाले आहेत. मात्र संकटात सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून दिलासा देण्यात आला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी याबाबतची घोषणा केली आहे.

या शेतकऱ्यांना सानुग्रह अनुदान देण्यात आलं आहे. मात्र यानंतर राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांचं ट्विट चर्चेत आलं आहे. रोहित पवार यांनी ट्विट केलं आहे की, अखेर राज्य सरकार झुकलं! आणि विधी भवना बाहेरील आंदोलनाचे फोटो पोस्ट केले आहे. ट्विटमध्ये लिहिलं आहे की, अखेर राज्य सरकार झुकलं!

कांद्याला ३०० रुपये प्रति क्विंटल अनुदान मिळणार. हा शेतकरी आणि विरोधी पक्षाच्या दबावाचा विजय आहे. मात्र कांद्याचा उत्पादन खर्च लक्षात घेता हे अनुदान तुटपुंजं असून राज्य सरकारने ते ७०० ₹ पर्यंत वाढवण्याची गरज आहे. शिवाय क्विंटलप्रमाणे अनुदान देण्याऐवजी सरसकट हेक्टरनुसार अनुदान देण्याबाबतही विचार व्हावा. अशी मागणी देखील रोहित पवार यांनी केली आहे.

दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी ही घोषणा केली आहे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना राज्य सरकार आता प्रति क्विंटल ३०० रुपये सानुग्रह अनुदान देणार आहे. २०० रुपये अनुदानाची शिफारस करण्यात आली होती, पण आपण ३०० रुपये देण्याचा निर्णय घेतला, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde: डोंबिवलीत ठाकरे गटाला धक्का! 40 वर्ष ठाकरेंसाठी काम करणाऱ्या नेत्याचा शिंदेसेनेत प्रवेश

PCB T20 WC 24 : वर्ल्डकप सुरू होण्याआधीच हरायची तयारी! गॅरी कर्स्टन बळीचा बकरा... पाकिस्तानचा माजी खेळाडू हे काय म्हणाला?

Crime: माजी मंत्र्याच्या क्रूर मारहाणीत पत्नीचा मृत्यू; घटना सीसीटीव्हीमध्ये कैद, लोकांमध्ये संताप

कोल्हापूर लोकसभेची निवडणूक ऐतिहासिक आणि कागल तालुक्याला आव्हान देणारी आहे; असं का म्हणाले मुश्रीफ?

Sucharita Mohanti: काँग्रेसची दुर्दशा सुरूच! आणखी एका उमेदवारानं परत केलं लोकसभेचं तिकीट; कारण ऐकून म्हणाल...

SCROLL FOR NEXT