ncp sharad pawar in thane critized bjp modi govt and eknath shinde maharashtra politics  esakal
महाराष्ट्र बातम्या

भाजपचे अच्छे दिन नागरिकांना कधीच पाहायला मिळाले नाहीत, शरद पवारांचा हल्लाबोल

सकाळ डिजिटल टीम

ठाणे : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आज ठाणे दौऱ्यावर आहेत, यावेळी बैठकीनंतर पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला यादरम्यान त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बालेकिल्ल्यात केंद्र सरकार तसेच राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर जोरदार हल्ला चढवला. भाजपचे अच्छे दिन नागरिकांना कधीच पाहायला मिळाले नाहीत असे शरद पवार म्हणालेत.

ठाणे तसेच राज्यात अनेक प्रश्न आहेत, राज्याचे आणि देशाचे सूत्र हातात असलेले एकाच विचाराचे आहेत. पवार म्हणाले की, शब्द आणि आश्वासने मोठ्या प्रमाणात देण्यात आली आहेत. या आश्वासनांचा आढवा घेतला तर तीथं काही झालेलं नाही. २०२१ साली निवडणूकांना सामोरे जाताना सत्ताधारी पक्षाने अच्छे दिन अशी घोषणा केली होती, त्यानंतर अच्छे दिनचं चित्र नागरिकांना जाणवल नाही. अच्छे दिन नागरीकांना कधीच पाहायला मिळाले नाहीत. २०२२ ला पुढच्या निवडणूकीच्या वेळी त्याचं विस्मरण झालं आणि न्यू इंडीया २०२२ अशी घोषणा करण्यात आली. २०२४ साठी आता नवीन आश्वासन दिलं जात आहे, ते म्हणजे ५ ट्रीलियन इकॉनॉमी आम्ही करू असा विश्वास देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सांगितल्यापैकी एकाही गोष्टीच शंभर टक्के पूर्तता झाल्याचे दिसत नाही, असे शरद पवार म्हणाले.

शरद पवारांनी पुढे बोलताना २०२२ पर्यंत प्रत्येकाला २४ तास वीज पुरवली जाईल असं देखील आश्वासन दिलं होतं. परंतु ते पूर्ण केलेलं नाही. ४४ टक्के देशातील लोकांना अजुनही वीज मिळालेली नाही, ही आकडेवारी केंद्राची आहे. त्यामुळे हे स्पष्ट आहे की जी आश्वासनं देण्यात आली ती पाळली गेली नाहीत. ग्रामपंचायतींनी इंटरनेट कनेक्शन देण्याच्या निर्णयाचा देखील यावेळी उल्लेख केला. २०२२ पर्यंत इंटरनेट देऊ असं आश्वासन २०२८ साली देण्यात आलं होतं, डिजिटल इंडीयाचा नारा देण्यात आला पण तसं झाल्याचं दिसत नाही. डिजिटल लिटरसी १०० टक्के करण्याचं आश्वासन पाळलं गेलं नाही, २०२२ पर्यंत देशातील प्रत्येक घराला टॉयलेट उपलब्ध असेल ते देखील पूर्ण झालं नाही, असे शरद पवार म्हणाले. यावेळी शरद पवारांना केंद्र सरकारची सर्व आकडेवारी देखील वाचून दाखवली

शरद पवारांनी यावेळी बोलताना ते राज्याचा दौरा करणार असल्याचे देखील सांगितले, मी ठाण्यात बैठकीसाठी अलो होतो. माझा प्रयत्न असा राहणार आहे की पक्षातील वरिष्ठ नेत्यांनी जिल्ह्या जिल्ह्यात जाऊन स्थानिक परिस्थितीचा आढावा घ्यावा. अजित पवार यांनी विदर्भाचा दौरा केला. मी देखील काही निवडक जिल्ह्यात जात आहे. त्यांची सुरुवात मी आजपासून ठाण्यापासून केली आहे असे ते म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Horoscope : 12 तारखेपासून सुरू होतोय गजकेसरी राजयोग! वृषभसह 4 राशीचं भाग्य उजळणार; होणार धनलाभ, प्रेमात यश, मोठं स्वप्न होईल पूर्ण

Masina Hospital Mumbai : मुंबईतील मसीना रूग्णालयात संतापजनक घटना! प्रोसेस अभावी मृतदेह आठ तास अडवून धरला

Google Search : 31 डिसेंबरच्या रात्री गुगलवर सगळ्यांत जास्त काय सर्च करण्यात आलं? धक्कादायक रिपोर्टमुळे जगभर खळबळ

Sanjay Raut : "सत्ताधारी गुंडांशिवाय निवडणूक जिंकूच शकत नाही"; पुण्यातून संजय राऊतांचा भाजप-राष्ट्रवादीवर घणाघात!

Ajit Pawar : “पुणेकरांना पाणी नाही, रस्त्यांवर खड्ड्यांचे साम्राज्य; भाजपाच्या महापालिका राजवटीत शहराचे अतोनात नुकसान”– अजित पवार!

SCROLL FOR NEXT