महाराष्ट्र बातम्या

राष्ट्रवादीची आज तातडीची बैठक 

सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी आज (ता. १७) ‘सिल्व्हर ओक’ या मुंबईतील निवासस्थानी सर्व मंत्र्यांची तातडीची बैठक बोलावली आहे. सकाळी ११ वाजता ही बैठक सुरू होईल.

कोरेगाव-भीमाचा तपास ‘एनआयए’कडे सोपविण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोध केला नाही, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहीर नमूद केले आहे. आता लवकरच राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवहीसाठी (एनपीआर) माहिती गोळा करण्याचे काम सुरू होणार आहे. या पद्धतीच्या गणनेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसचा विरोध असल्याचे बोलले जाते. उद्याच्या बैठकीत त्याबाबत चर्चा होऊ शकते. मात्र, पक्षाचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी, ‘सरकारच्या पातळीवर कोणतेही वाद नाहीत. पवारसाहेबांनी मंत्र्यांना चर्चा करण्यासाठी बोलावले आहे,’ असे स्पष्ट केले.

काँग्रेसनेही ‘एनपीआर’साठी माहिती गोळा करणे सुरू झाल्यावर कोणती भूमिका घ्यायची, हे ठरविले आहे. लोकसंख्येची नोंद करण्यात काहीही आक्षेपार्ह नसल्याचे मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केले आहे. एक मेपासून गणना सुरू होणार असून, त्यापूर्वी महाविकास आघाडीच्या समन्वय समितीची बैठक बोलावली जाण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Delhi Fire Accident : पाच मजली इमारतीला सकाळी अचानक लागली आग, एकाच कुटुंबातील ७ जणांचा होरपळून मृत्यू, दोघे गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : चंद्रपुरातील सागवान तस्करांना राजकीय राजाश्रय मिळतो का?

सारा अली खानला केदारनाथमध्ये येण्यास बंदी! मंदिर प्रशासनाचा निर्णय, म्हणाले...'ती स्वत:ला सनातनी मानत असली तरी ती..'

Grandmother Rescue Story: राहुरीत भीषण आग; नातींना वाचवण्यासाठी आजीची ज्वाळांत उडी, जीवावर बेतलं धाडस, नेमकं काय घडलं!

EV कडे वाढता कल, पण सुरक्षिततेचा मोठा प्रश्न! दुर्घटनेनंतर मंत्र्यांचा इशारा; चार्जिंगला लावून झोपलेल्या कुटुंबातील 8 जण जिवंत जळाले

SCROLL FOR NEXT