New Maharashtra Government 
महाराष्ट्र बातम्या

महासत्तांतर

सकाळ न्यूज नेटवर्क

शपथविधी  २८ नोव्हेंबरला शिवाजी पार्कवर
मुंबई -  राज्यातील जनतेला एकामागून एक धक्के देणाऱ्या राजकीय नाट्याचा अखेरचा अंक आज सुरू झाला. अजित पवारांनी ऐनवेळी साथ दिल्याने स्थापन झालेले देवेंद्र फडणवीस सरकार, त्यांनीच ऐनवेळी साथ सोडल्याने आज कोसळले. सत्ता स्थापण्यास उत्सुक असलेल्या महाविकास आघाडीने हातातोंडाशी आलेला घास पुन्हा न गमाविण्यासाठी वेगवान हालचाली करत अधिकृतपणे आघाडीची घोषणा केली आणि लगोलग शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली सत्तास्थापनेचा दावा केला. २८  नोव्हेंबरला संध्याकाळी ५ वाजता शिवाजी पार्कवर ठाकरे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतील. ‘सर्व काही जनतेच्या हितासाठी’ या नावाखाली घडणाऱ्या या अतिवेगवान राजकीय घडामोडींमुळे सामान्य जनताही अवाक् झाली.

तब्बल वीस वर्षांनंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा मुख्यमंत्री राज्याच्या मुख्यमंित्रपदावर विराजमान होणार यावर आज शिक्‍कामोर्तब झाले आहे. तत्पूर्वी, सर्वोच्च न्यायालयाने उद्याच सभागृहात बहुमत सिद्ध करण्यास सांगितल्यानंतर राष्ट्रावादीचे बंडखोर नेते व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामा दिला. त्यामुळे बहुमतापर्यंत पोचू शकणार नसल्याची जाणीव होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही राजीनामा दिला. त्यामुळे फडणवीस सरकारचा कारभार चार दिवसांत उरकला. त्यानंतर वेगवान घडामोडी घडल्या व नवे सरकार अस्तित्वात येण्यासाठीच्या हालचाली गतिमान झाल्या.

वांद्रे येथील ट्रायडन्ट हॉटेलमध्ये महाविकास आघाडीची संयुक्‍त बैठक पार पडली. या वेळी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेस पक्षाच्या नेत्यांसह इतर घटक पक्ष व अपक्ष आमदार उपस्थित होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या नेतेपदी उद्धव ठाकरे यांचे नाव सुचवणारा ठराव मांडला. तर, काँग्रेसचे विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी या ठरावाला अनुमोदन देत उद्धव ठाकरे यांच्या नावाची घोषणा केली. उद्धव यांनी बैठकीनंतर राजभवनात जाऊन सरकार स्थापनेचा दावा केला. शिवाजी पार्कवर २८ नोव्हेंबरला त्यांचा शपथविधी होणार आहे. त्यांना बहुमत सिद्ध करण्यासाठी ३ डिसेंबरपर्यंत मुदत राज्यपालांनी दिली आहे. दरम्यान, महाविकास आघाडीने आज संविधान दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्राच्या सत्तास्थापनेचा पेच सोडवताना सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे अभिनंदन करणारा ठरावदेखील संमत केला. याबाबतचा ठराव सुभाष देसाई यांनी मांडला व त्याला काँग्रेस नेते अशोक चव्हाण आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अनिल देशमुख यांनी अनुमोदन दिले. 

शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व इतर घटक पक्षांची महाविकास आघाडी स्थापन करण्याचा ठराव शिवसेनेचे विधिमंडळ पक्षनेते एकनाथ शिंदे यांनी मांडला. महाविकास आघाडीचे शिल्पकार शरद पवार यांचे मी अभिनंदन करतो. तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचेही स्वागत करतो. उद्धवजी ठाकरे या राज्याचे नेतृत्व करणार असल्याने महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांना शुभेच्छा देतो, अशा भावना शिंदे यांनी ठराव मांडताना व्यक्‍त केल्या. या ठरावाला काँग्रेस नेते डॉ. नितीन राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी अनुमोदन दिले.

वरील दोन्ही ठरावाला शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी, समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी, प्रहार संघटनेचे नेते आमदार बच्चू कडू लोकभारतीचे कपिल पाटील यांनी अनुमोदन दिले.

राज्यघटनेतील मूल्यांवर आधारित या आघाडी सरकारचा कार्यक्रम राबविणार आहे. मी एकटाच मुख्यमंत्री नाही; तर आघाडीतले सर्व सदस्य मुख्यमंत्री म्हणूनच एकदिलाने काम करू. सहकार्य करू. माझं सरकार सुडाचे राजकारण करणार नाही. शेतकऱ्यांच्या डोळ्यांतील अश्रू पुसण्याचे कर्तव्य आपले सरकार करेल.
- उद्धव ठाकरे, शिवसेनेचे पक्षप्रमुख 

राज्यात महाविकास आघाडीचे सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली स्थापन होत असल्याचा आनंद असून, हे सरकार महाराष्ट्राला प्रथम क्रमांकाचे राज्य म्हणून स्थान मिळवून देईल. या नव्या आघाडीने देशाला नव्या राजकारणाची दिशा दिली असून, संविधानात्मक मूल्ये जोपासणारे नव्या आघाडीचे राजकारण सुरू झाले आहे.
- शरद पवार, ‘राष्ट्रवादी’चे अध्यक्ष

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT