महाराष्ट्र बातम्या

अंतिम वर्षाच्या परिक्षांवरुन नवे 'वादळ', पुन्हा राज्य विरुद्ध राज्यपाल ?

सकाळवृत्तसेवा

मुंबई : निसर्ग वादळाचा मुंबईसह महाराष्ट्राला तडाखा बसणार असतानाच अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावरुन नवे वादळ संपूर्ण राज्यात घोंघावण्यास सुरुवात झाली. अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केल्यानंतर 48 तासाच्या आत राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांनी त्या निर्णयास स्थगित दिली आहे. 

भारतीय जनता पक्षाचे आशिष शेलार यांनी राज्यपालांची भेट घेतली आणि त्यांना परिक्षा रद्द करण्याचा निर्णय चूकीचा असल्याचे सांगितले असल्याची चर्चा सुरु झाली. अखेरच्या सत्राची परिक्षा न घेता त्यापूर्वीच्या सत्राच्या परिक्षेतील गुणांची टक्केवारी काढून त्यानुसार गुण देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. त्याचवेळी ज्या विद्यार्थ्यांना आपले गुण वाढवायचे असतील त्यांना परिक्षा देण्याचीही मुभा दिली होती. मात्र त्यास भारतीय जनता पक्षाने विरोध केला होता. आता संध्याकाळी राज्यपाल कोश्यारी यांनी ट्वीट करुन परिक्षा रद्द करण्याचा निर्णय स्थगित केला असल्याचे कळवले. 

राज्यपाल हे महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांचे कुलपती आहेत. त्यामुळे अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करण्याचा निर्णय आपल्याशी चर्चा करुन घ्यायला हवा होता, महाराष्ट्र विद्यापीठ कायद्यानुसार हे आवश्यक आहे, असे ट्वीट त्यांनी केले. त्यानंतर त्यांनी याबाबतचा निर्णय विद्यापीठ कायद्यानुसार होईल असे सांगितले.

news issues over conducting final year exams in maharashtra read full news

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi Reaction On Bihar Voting : बिहारमध्ये पहिल्या टप्प्यातील विक्रमी मतदानावर पंतप्रधान मोदींची पहिली प्रतिक्रिया आली समोर, म्हणाले...

Bus and Milk Tanker Accident : बस अन् दुधाच्या टँकरची समोरासमोर धडक; एका मुलासह तिघांचा मृत्यू, १७ प्रवासी जखमी

पुणे ते छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेसवे प्रकल्पाला वेग; तीन टप्प्यात पूर्ण होणार, वैशिष्ट्ये काय आहेत?

Bihar Election 2025 Voting : बिहारमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ऐतिहासिक मतदान!

Akola Raid : लाच घेताना महिला लिपिक रंगेहात पकडली; अकोला एसपी कार्यालयात एसीबीचा छापा!

SCROLL FOR NEXT