In Nine Month 53 Killed in Man-Animal Conflict in Maharashtra 
महाराष्ट्र बातम्या

नऊ महिन्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात महाराष्ट्रात ५३ जणांनी गमावले जीव

राजेश रामपूरकर

नागपूर :  वन्यप्राण्यांच्या वास्तव्यक्षेत्राचा संकोच झाल्याने मानव-वन्यजीव संघर्ष टोकाला पोहोचला आहे. राज्यात संरक्षित क्षेत्रासोबतच प्रादेशिक क्षेत्रातही वाघांसह इतरही वन्यप्राण्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळेच राज्यात यावर्षी नऊ महिन्यात अर्ध्याशतकापेक्षा अधिक जणांचे बळी गेले आहेत. गेल्या दोन वर्षाच्या तुलनेत ही आकडेवारी दुप्पटीने वाढली आहे. मध्य चांदामधील विरुर वन परिक्षेत्रातील नवेगाव येथे शेतकऱ्यावर आज हल्ला करून ठार केले. 

राज्यात वाघासह वन्यप्राण्यांची संख्या वाढू लागले आहे. संख्या वाढत असताना त्यांचा अधिवास, भ्रमणमार्ग खंडीत होऊ लागले आहेत. त्यामुळे वन्यजीव आणि मानव आमने सामने येऊ लागल्याने संघर्ष वाढलेला आहे. २०१८ आणि २०१९ या दोन वर्षात वन्यप्राण्यांनी हल्ला केल्यामुळे मृत पावलेल्यांची संख्या अनुक्रमे ३६ आणि ३२ होती. यंदा आतपर्यंत तो आकडा ५३ वर गेला आहे. त्यात सर्वाधिक ३२ वाघांच्या तर ११ बिबट्याच्या हल्ल्यात बळी गेले आहेत.

मध्यप्रदेशात यंदा फक्त १७ जणांचे जीव वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात गेलेले आहेत. ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रात सुरू झालेला हा संघर्ष आता सर्वच अभयारण्य, व्याघ्र प्रकल्पाचे बफर क्षेत्र, इको सेन्सेटिव्ह झोन व आजूबाजूच्या गावांमध्ये पोहोचला आहे. वाघ, बिबट, अस्वल, रानगवा, रानडुक्कर, लांडग्यांचे अस्तित्व असलेल्या भागात हा संघर्ष वाढला आहे. यवतमाळ, भंडारा, गोंदिया, नागपूर, वर्धा जिल्ह्यातील गावाजवळ वाघ आल्याच्या अनेक घटना आहे. सध्या कोरोनाचे संकट घोंगावत असताना आता वन्यप्राण्यांचीही भीती वाढू लागली आहे. 

  • वर्ष - मृत्यू 
  • २०१६ - ५३ 
  • २०१७ - ५० 
  • २०१८ - ३६ 

  • २०१९ - ३२ 
  • २०२० सप्टेंबर - ५३ 

मानव-वन्यजीव संघर्ष कमी करण्यावर भर 

वन्यप्राण्यांची संख्या वाढत असल्याने मानवावरील हल्ले वाढलेले आहेत. यावर नियंत्रण आणण्यासाठी शासनाकडून विविध योजना आणल्या आहेत. मनुष्याचे वनावरील अवलंबित्व कमी करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. 
संजय राठोड, वनमंत्री 

उपाययोजना करणार 

चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या लक्षात घेता तेथील संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना करणे गरजेचे आहे. यंदा वाघासह लांडगा, अस्वल, बिबट, गवा आणि रानडुक्करांच्या हल्ल्यातही ही मनुष्यहानी झालेली. 
नितीन काकोडकर, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: पाकिस्तान UAE ला पराभूत करत 'सुपर फोर'मध्ये! भारताविरुद्ध पुन्हा होणार सामना, पण कधी अन् केव्हा? जाणून घ्या

Athletics Championship 2025: नीरज चोप्रा विरुद्ध अर्शद नदीम लढत होणार! जाणून घ्या कुठे अन् किती वाजता पाहाता येणार फायनल

PAK vs UAE: पाकिस्तानी विकेटकिपरच्या थ्रोमुळे अंपायरला मोठी दुखापत, मैदानंच सोडावं लागलं; जाणून घ्या नेमकं काय घडलं

Meenatai Thackeray statue case Update: मोठी बातमी! मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर रंग फेकणाऱ्यास २४ तासांच्या आत अटक; गुन्हाही केला कबूल

Disha Patani’s house firing incident: दिशा पटानीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या दोन शूटर्सचा अखेर गाझियाबादमध्ये खात्मा!

SCROLL FOR NEXT