Exam sakal
महाराष्ट्र बातम्या

आता विद्यापीठाची २२ नव्हे ३० एप्रिलपासून परीक्षा! अर्ज भरण्याची मुदत २४ एप्रिलपर्यंत; यंदा विलंब शुल्क न घेण्याचा निर्णय; लेखीनंतर १० दिवसांत प्रात्यक्षिक

बीए, बीकॉम, बीएस्सी, बीबीए, बीसीए, लॉ या पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा ३० एप्रिलपासून सुरू होणार आहेत. विद्यापीठाशी संलग्नित १०९ महाविद्यालयांनी त्यांच्याकडील सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म २४ एप्रिलपर्यंत भरून विद्यापीठाला सादर करायचे आहेत.

तात्या लांडगे

सोलापूर : पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाची अंतिम सत्र परीक्षा २२ एप्रिलऐवजी आता ३० एप्रिलपासून घेण्याचा निर्णय झाला आहे. परीक्षेचा अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांना २४ एप्रिलपर्यंत मुदत देण्यात आली असून या सत्र परीक्षेचे अर्ज भरताना विद्यार्थीहिताचा विचार करून विद्यापीठाने विलंब शुल्क न घेण्याचा निर्णय घेतला आहे.

बीए, बीकॉम, बीएस्सी, बीबीए, बीसीए, लॉ या पदवी अभ्यासक्रमांच्या परीक्षा ३० एप्रिलपासून सुरू होणार आहेत. विद्यापीठाशी संलग्नित १०९ महाविद्यालयांनी त्यांच्याकडील सर्व विद्यार्थ्यांचे परीक्षा फॉर्म २४ एप्रिलपर्यंत भरून विद्यापीठाला सादर करायचे आहेत. त्यानंतर विद्यापीठाकडून संबंधित विद्यार्थ्यांना ई-मेलवर हॉल तिकीट पाठविली जाणार आहेत. परीक्षेच्या अनुषंगाने विद्यापीठाने प्रश्नपत्रिका यापूर्वीच तयार केल्या आहेत.

आता परीक्षेसाठी विद्यार्थ्यांनी केलेले अर्ज महाविद्यालयांनी वेळेत विद्यापीठाला पाठविणे आवश्यक आहे. दरम्यान, अभियांत्रिकीची परीक्षा १० मेपासून सुरू होण्याची शक्यता असून त्यांचे वेळापत्रक अजून अंतिम झालेले नाही. परीक्षा ४० ते ४५ दिवसांत संपवून विद्यापीठाला वेळेत निकाल लावावा लागणार आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना नोकरी किंवा पुढील प्रवेशासाठी अडचणी येणार नाहीत.

निकाल वेळेत लावण्याचे नियोजन

विद्यापीठाच्या निर्णयानुसार आता अंतिम सत्र परीक्षा ३० एप्रिलपासून सुरू होईल. महाविद्यालयांनी एकही विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहणार नाही, याची खबरदारी घ्यावी. २४ एप्रिलपर्यंत परीक्षेसाठी अर्ज भरता येणार आहेत. परीक्षेनंतर निकाल वेळेत लावण्याचे नियोजन केले आहे.

- डॉ. लक्ष्मीकांत दामा, प्र कुलगुरू, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ

लेखी परीक्षेनंतर १० दिवसांत प्रात्यक्षिक

परीक्षेचे अर्ज सर्व विद्यार्थ्यांनी भरले नसल्याने विद्यापीठाची परीक्षा २२ एप्रिलऐवजी ३० एप्रिलपासून सुरू होणार आहे. उन्हाची तीव्रता वाढत असतानाच अंतिम सत्र परीक्षा होत आहे. लेखी परीक्षा काही दिवसांवर आल्याने सलंग्नित १०९ महाविद्यालयांना विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक घेणे शक्य नाही. त्यामुळे लेखी परीक्षा झाल्यावर १० दिवसांत ज्या विद्यार्थ्यांचे प्रात्यक्षिक राहिले, त्यांचे प्रात्यक्षिक घेण्याचे आदेश विद्यापीठाने महाविद्यालयांना दिले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gotya Gitte: वाल्मिक कराड माझे दैवत, धनंजय मुंडेंना बदनाम करु नका, नाहीतर... फरार गोट्या गित्तेची जितेंद्र आव्हाडांना धमकी, व्हिडिओ व्हायरल

PM Narendra Modi : जागतिक अनिश्‍चिततेत राष्ट्रहित जपणार; ‘स्वदेशी’ वापरण्याचे पंतप्रधानांचे आवाहन

Harshwardhan Sapkal : काँग्रेसचा विचार हा पाकिस्तानचे दोन तुकडे करणारा

Rahul Mote : परंडा मतदारसंघांमध्ये पुन्हा वाजणार का? 'घड्याळाची ठकठक' घड्याळ तेच वेळ नवी!

MP Nilesh Lanke : अहिल्यानगर शहर पोलिस प्रशासनावर राजकीय दबाव; खासदार नीलेश लंके यांचा गंभीर आरोप

SCROLL FOR NEXT