zp schools sakal
महाराष्ट्र बातम्या

नवीन शिक्षकांना ‘पुन्हा बदली मागणार नाही’ असे लेखी देण्याचे बंधन! विनंती बदल्यानंतर नवीन भरती झालेल्यांना नियुक्ती; विनंती बदलीसाठी 3000 अर्ज

जिल्हा परिषदेतील दोन हजार ७९५ शाळांवरील जवळपास तीन हजारांहून अधिक शिक्षकांनी विनंती बदलीसाठी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे अर्ज केले आहेत. नवीन भरतीतून आलेल्या शिक्षकांना नियुक्ती देण्यापूर्वी विनंती बदल्यांची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : जिल्हा परिषदेतील दोन हजार ७९५ शाळांवरील जवळपास तीन हजारांहून अधिक शिक्षकांनी विनंती बदलीसाठी प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांकडे अर्ज केले आहेत. नवीन भरतीतून आलेल्या शिक्षकांना नियुक्ती देण्यापूर्वी विनंती बदल्यांची प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. दुसरीकडे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर नवीन शिक्षकांना नियुक्ती मिळणार आहे.

शालेय शिक्षण विभागाने दोन महिन्यांपूर्वी राज्यातील जिल्हा परिषदांसह अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांमधील शिक्षकांची भरती केली. पण, लोकसभेच्या आचारसंहितेमुळे अनेकांना नियुक्ती मिळालेली नाही. निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर जूनच्या पहिल्या आठवड्यात त्या सर्वांनाच नियुक्ती दिली जाणार आहे. तत्पूर्वी, जिल्हा परिषद शाळांवरील पूर्वीच्या शिक्षकांच्या विनंती बदल्यांची कार्यवाही पार पडणार आहे.

१५ जूनपासून शाळा सुरू होण्यापूर्वी विनंती बदल्या व नवीन शिक्षकांना नियुक्ती, या दोन्ही प्रक्रिया पूर्ण केल्या जाणार आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील अनेक जिल्हा परिषद शाळांचा पट १० ते २० दरम्यान असून त्यांना पटसंख्या वाढवावी लागणार आहे. शालेय शिक्षण विभागाच्या नवीन आदेशानुसार आता विद्यार्थ्यांच्या प्रमाणात शाळांना शिक्षक मिळतील, अशी अपेक्षा आहे. मात्र, अनेक शिक्षक दूर अंतरावरील शाळांमध्ये जाण्यास तयार नसतात आणि त्यामुळे त्याठिकाणी विद्यार्थ्यांच्या प्रमाणात शिक्षक नसतात ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे विनंती बदल्यांची प्रक्रिया पार पाडताना जिल्ह्याच्या सीमावर्ती तालुक्यांमधील शाळांना पुरेशा प्रमाणात शिक्षक द्यावे लागणार आहेत.

शासनाच्या आदेशानुसार होईल कार्यवाही

शासनाच्या आदेशानुसार जिल्ह्यातील शिक्षकांच्या विनंती बदल्या होतील. त्याची कार्यवाही सध्या सुरू असून लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर नवीन भरती झालेल्या शिक्षकांना शाळांवर नियुक्ती दिली जाणार आहे. तत्पूर्वी, समुपदेशनाची प्रक्रिया पार पडेल.

- कादर शेख, प्राथमिक शिक्षणाधिकारी, जिल्हा परिषद, सोलापूर

बदली मागणार नसल्याचे द्यावे लागणार लेखी

नवीन शिक्षक भरतीतून सोलापूर जिल्हा परिषदेला २७४ शिक्षक मिळाले आहेत. त्यांच्या कागदपत्रांची पडताळणी झाल्यानंतर त्यांचे समुपदेशन होऊन त्यांना जिल्हा परिषदेच्या वेगवेगळ्या शाळांवर नियुक्ती दिली जाईल. पण, त्यावेळी प्रत्येक नवनियुक्त शिक्षकास पुन्हा बदली मागणार नाही, असे लेखी द्यावे लागणार आहे. शासनाच्या आदेशानुसार नवनियुक्त शिक्षकांना एकाच शाळेवर तथा जिल्ह्यात सेवानिवृत्त होईपर्यंत काम करावे लागणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Amit Shaha : शिवरायांनी स्वराज्याचे संस्कार रुजविले... पेशव्यांनी स्वराज्य पुढे नेले; अमित शाहांचे पुण्यात गौरवोद्गार

Latest Maharashtra News Updates : उद्या ठाकरेंचा विजयी मेळावा- वरळी डोममध्ये तयारी सुरु

ST Pass : एकाच महिन्यात 5 लाख विद्यार्थ्यांना शाळेत मिळाले एसटी पास; कोणाला मिळतो सवलतीचा पास? वाचा...

Indian Women Cricket Team: भारतीय महिला संघ आज रचणार इतिहास; T20 मालिका जिंकण्याची संधी

"निलेश तू कसा आहेस माहितीये..." साबळेंच्या व्हायरल व्हिडिओनंतर मराठी अभिनेता झाला व्यक्त ; म्हणाला..

SCROLL FOR NEXT