Sakal-Exclusive sakal
महाराष्ट्र बातम्या

उजनीतून शेतीला पाणी सोडण्यासाठी १३ वर्षांपूर्वीच्या ‘त्या’ निर्णयाचा अडसर! पंढरपूरला गुरुवारी तर सोलापूरसाठी १५ सप्टेंबरला पाणी

शेतीसाठी उजनीतून पाणी सोडण्याची वारंवार केली जात आहे. परंतु, २००१च्या शासन निर्णयानुसार धरणातील जिवंत पाणीसाठा ३३ टक्के झाल्याशिवाय शेतीला पाणी सोडता येत नाही. सध्या धरण १७.२१ टक्क्यांवर असल्याने फक्त पिण्याच्याच पाण्याला प्राधान्य दिले जात आहे.

तात्या लांडगे

सोलापूर : जून ते ४ सप्टेंबर या काळात जिल्ह्यातील जवळपास ७१ महसूल मंडळात खूपच कमी दिवस पाऊस पडला आहे. आता दोन दिवसांपासून पावसाला सुरवात झाली आहे, पण अजूनही सर्वत्र समाधानकारक पाऊस नाही. त्यामुळे शेतीसाठी उजनीतून पाणी सोडण्याची वारंवार केली जात आहे. परंतु, २००१च्या शासन निर्णयानुसार धरणातील जिवंत पाणीसाठा ३३ टक्के झाल्याशिवाय शेतीला पाणी सोडता येत नाही. सध्या धरण १७.२१ टक्क्यांवर असल्याने फक्त पिण्याच्याच पाण्याला प्राधान्य दिले जात आहे.

उजनी धरणात एकूण १०० टीएमसीपर्यंत पाणी मावते. त्यात ६४ टीएमसी मृतसाठा तर ५६ टीएमसी उपयुक्त (जिवंत) पाणीसाठा आहे. सध्या धरणात एकूण ७२.९२ टीएमसी पाणी असून त्यात जिवंतसाठा केवळ सव्वानऊ टीएमसीच आहे. अजूनही सर्वदूर समाधानकारक पाऊस झालेला नाही. हवामान खात्याचे अंदाज यंदाच्या पावसाळ्यात बहुतेकवेळा चुकल्याने यंदा दुष्काळी स्थितीचा सामना करावा लागतो, अशी शक्यता वर्तविली जात आहे.

या पार्श्वभूमीवर धरणात साठलेले पाणी सोडून देणे भविष्यासाठी धोक्याचे ठरू शकते, असे अधिकाऱ्यांचे मत आहे. त्यामुळे तुर्तास धरणातील पाणीसाठा ३३ टक्के होण्याची शेतकऱ्यांना वाट पाहावी लागणार आहे. सोलापूर शहरासाठी उजनीतून १५ तारखेला पाणी सोडले जाणार आहे. सध्याच्या पावसामुळे धरण ३३ टक्क्यांपेक्षा अधिक भरल्यावर कालवा सल्लागार समितीच्या निर्णयानुसार गरजेच्या ठिकाणी शेतीला पाणी सोडता येईल, असेही अधिकारी सांगत आहेत.

पंढरपूरसाठी गुरुवारी सुटणार पाणी

पंढरपूर शहरासाठी दोन दिवस पुरेल इतकाच पाणीसाठा त्याठिकाणी शिल्लक आहे. २० दिवसांपूर्वी पंढरपूर नगरपालिकेने उजनीतून पाणी सोडावे, असे पत्र लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाला दिले आहे. त्यानुसार सोलापूर आणि पंढरपूर या दोन्ही शहरांसाठी एकावेळी भीमा नदीतून पाणी सोडण्याचे नियोजन होते. परंतु, सोलापूर शहराला आणखी २५ दिवस पुरेल इतका पाणीसाठा औज बंधाऱ्यात आहे. त्यामुळे आता पंढरपूरसाठी गुरुवारी (ता. ७) पाणी सोडण्यात येणार असून तसे आदश जिल्हाधिकारी कुमार आशिर्वाद यांनी लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाला दिले आहेत.

नदी काठावरील वीज होणार बंद

उजनीतून भीमा नदीद्वारे पंढरपूर शहरासाठी पाणी सोडताना दीड टीएमसी पाणी लागते. पण, सद्य:स्थितीत अर्धा टीएमसी पाणी वाचविण्याचे प्रयत्न लाभक्षेत्र विकास प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांकडून सुरु आहेत. उजनी धरणातून पंढरपूर शहरासाठी पाणी सोडण्यापूर्वी ‘महावितरण’ला पत्र पाठवून नदी काठावरील कृषीपंपाचे वीज कनेक्शन बंद केले जाणार असल्याचेही सूत्रांनी सांगितले.

उजनी धरणाची सद्य:स्थिती

  • एकूण पाणीसाठा

  • ७२.९२ टीएमसी

  • उपयुक्त साठा

  • ९.२७ टीएमसी

  • ‘उपयुक्त’ची टक्केवारी

  • १७.२१ टक्के

  • दौंडवरून येणारा विसर्ग

  • ४००० क्युसेक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Raj Thackeray: उद्धव ठाकरे आणि शिवसेनेपासून राज ठाकरे दूर का होत गेले? वाद ते मनोमिलन timeline

IND vs ENG 2nd Test: शुभमन गिलच्या ३००+ धावा! मोडला विराट कोहलीचा ११ वर्षांपूर्वीचा विक्रम, रिषभ पंतचीही फिफ्टी

Sushil Kedia: माज उतरला, पण गुर्मी कायम; माफीनंतरही नवं ट्विट करत सुशील केडिया पुन्हा बरळले, शहांची स्तुती तर ठाकरेंना...

Divyang Students Demand : दिव्यांग विद्यार्थ्यांची होतेय कुचंबना! ३० जुलैपर्यंत वसतिगृहाचा प्रश्न मार्गी लावा अन्यथा...; विद्यार्थ्यांचा सरकारला इशारा

Raigad News: अलिबाग मार्गावरील कोंडी सुटणार, प्रवाशांचा आरामदायी प्रवास होणार; सरकारचा प्लॅन सत्यात उतरणार

SCROLL FOR NEXT