parth pawar  
महाराष्ट्र बातम्या

इंग्रजी ट्विटवरून पार्थ पवार झाले ट्रोल

सकाळ डिजिटल टीम

पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी काल अचानक आपल्या आमदारकीचा राजीनामा दिला आहे. त्यांच्या राजीनाम्याची माहिती कोणालाही नव्हती. खुद्द पक्षाचे अध्यक्ष शरद पवार या निर्णयापासून अनभिज्ञ होते. या संदर्भात अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ यांनी शरद पवार यांना माहिती दिली. पार्थ यांनी याविषयीचे एक ट्विटही केले आहे. पण, त्या ट्विटवरून पार्थ यांना ट्रोल केले जात आहे.

काय घडले?
अजित पवार यांनी दिलेल्या राजीनाम्याविषयी शरद पवार यांनी पुण्यातील पत्रकार परिषद माहिती दिली. अजित पवार यांनी राजीनामा देण्यापूर्वी मला कोणतिही माहिती दिली नाही, असे पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तसेच त्यांच्याशी संपर्क झालेला नसून, अजित पवार यांनी केवळ पार्थ पवारांना या निर्णायविषयी माहिती दिल्याचे सांगितले. अजित पवार यांनी त्यांच्या मुलांना राजकारण सोडण्याचा सल्ला देत कुटुंबीयांशी राजीनाम्याबाबत चर्चा केल्याची माहिती पवार यांनी यावेळी दिली. त्यानंतर पार्थ पवार यांनी हे ट्विट केले आहे.

काय आहे पार्थ यांचे ट्विट?
अजित पवार यांनी राजीनामा दिल्यानंतर त्यांचा मुलगा पार्थ पवार याने ट्विट केले. त्यात म्हटले आहे की, ‘आजचा दिवस माझ्यासाठी भावनिक आणि अत्यंत अवघड होता. वडिलांबरोबर झालेले संभाषण आमच्या कुटुंबाचे प्रमुख म्हणून शरद पवार यांना सांगितले आहे.’ इंग्रजीत असलेल्या या ट्विटवरून ट्विटवर पार्थ पवार लक्ष्य होत आहेत. As a head of our family हे त्यांना आपल्यासाठी म्हटल्याचे दाखवत, पार्थ यांच्या इंग्रजीतील चुका काढल्या आहेत. पार्थ स्वतःला कुटुंबप्रमुख कसे काय म्हणू शकतात, असा प्रश्न ट्विटरवर विचारला जात आहे. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Winter Update : राज्यातील थंडी गायब की गारठा कायम राहणार? हवामान विभागाचा महत्त्वाचा अंदाज समोर

PIFF Mahotsav : ‘पिफ’ १५ जानेवारीपासून रंगणार; सुमारे १४० चित्रपट दाखविले जाणार

होता स्‍कार्फ म्‍हणून वाचला गळा! 'बिबट्याचा वृद्ध महिलेवर जीवघेणा हल्ला; गवतातून झडप, जिवाच्या आकांताने आरडाओरडा अन्..

सोलापूर जिल्ह्यात 2 वर्षात 1350 जणांचा अपघाती मृत्यू! दुपारी 4 ते रात्री 12 या वेळेत सर्वाधिक अपघात; ‘या’ 5 महिन्यात अपघाताचे प्रमाण जास्त

लाडक्या बहिणींना ‘ई-केवायसी’साठी ३१ डिसेंबरपर्यंत मुदत! महापालिकेत लाडक्या बहिणींचे मतदान आपल्यालाच मिळावे म्हणून भावी नगरसेवकांकडून मोफत ‘ई-केवायसी’ शिबिरे

SCROLL FOR NEXT