Ajit Pawar
Ajit Pawar sakal
महाराष्ट्र

लसीकरणाला ग्रामीण भागातील लोक गांभीर्यानं घेताना दिसत नाहीत - अजित पवार

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देताना अजित पवारांनी आज राज्यातील कोरोना संसर्गाच्या स्थितीवरही भाष्य केलं. तसेच ग्रामीण भागात कोरोनाच्या स्थितीला गांभीर्यानं घेतलं जात नाहीए, असंही त्यांनी म्हटलं आहे. यासाठी त्यांनी चीनमधील शहरांमध्ये सध्या लॉकडाउन लावण्यात येत असल्याची माहिती दिली. (People in rural areas do not seem to take vaccination seriously says Ajit Pawar)

पवार म्हणाले, एक गोष्ट मी आजच्या उत्तराच्या निमित्त महाराष्ट्राच्या जनतेला सांगतो की, ज्या चीनमधून कोरोना वाढीला लागला त्या चीनमध्ये आज पंधरा पेक्षा जास्त महत्वाची शहरं लॉकडाऊन झाली आहेत. म्हणजेच कोरोनाचा विषय सध्या आपणही सहजतेनं घेऊ नका, याच्याकडे गांभीर्यानं पाहा. दीड कोटी लोकसंख्या असलेलं चीनमधील एक शहर लॉकडाऊन करण्यात आलं आहे. हा आजार बाहेर वाढू नये, चौथी लाट येऊ नये यासाठी ही काळजी घेतली आहे. आपणही कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी काळजी घेतली पाहिजे.

अजूनही काही जण लसीकरणाच्या बाबतीत म्हणावा असा प्रतिसाद देत नाहीत. कारण ग्रामीण भागात फिरत असताना लोक लसीकरणाला गंभीरतेनं घेत नसल्याची वस्तूस्थिती आहे. पण आपण लोकप्रतिनिधी म्हणून त्यांना लसीकरणाचं महत्व समजावून सांगण्याची नितांत गरजेच आहे, असंही अजित पवार यांनी सभागृहातील सर्वच सदस्यांना आवाहन केलं.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Toll Rate Hike: मतदान संपले.. आजपासून वाढणार देशातील टोल, प्रवाशांच्या खिशाला कात्री

Mumbai Local Train : मुंबईत पश्चिम रेल्वेची सेवा विस्कळीत; चर्चगेटच्या दिशेने धावणाऱ्या गाड्या उशिराने

SL vs SA T20 WC 24 : श्रीलंकेसमोर दक्षिण आफ्रिकेला रोखण्याचे आव्हान! मार्करम-हसरंगा आमने-सामने

Salman Khan: सलमान खानच्या हत्येसाठी ७० तरूण महाराष्ट्रात; नवी मुंबई पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेक खुलासे

Latest Marathi News Live Update: मतदानानंतर महागाईचा झटका! तांदूळ-दाळ, कोथिंबिर, मिरची झाली महाग

SCROLL FOR NEXT