महाराष्ट्र

तीर्थक्षेत्र विकास आराखडा मंजूर

सकाळवृत्तसेवा

मुंबई - ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्या अंतर्गत श्री संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी आमला (ता. दर्यापूर, जि. अमरावती) साठी 6.79 कोटी, श्री संत गाडगेबाबा यांचे अंतिम श्रद्धास्थान नागरवाडी (ता. चांदूरबाजार, जि. अमरावती) साठी 18 कोटी आणि हिंगोलीतील श्री. संत नामदेव संस्थानसाठी पहिल्या टप्प्यात 15 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यास तसेच गणपतीपुळेच्या 10 कोटी रुपयांच्या तीर्थक्षेत्र विकास आराखड्यास आज शिखर समितीच्या बैठकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मान्यता दिली. 

ग्रामीण तीर्थक्षेत्रांच्या विकास आराखड्यासंदर्भात "वर्षा' या शासकीय निवासस्थानी झालेल्या बैठकीस ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, अमरावतीचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील, सामाजिक न्याय राज्यमंत्री व हिंगोलीचे पालकमंत्री दिलीप कांबळे, वित्त व नियोजन राज्यमंत्री दीपक केसरकर, आमदार तानाजी मुटकुळे, आमदार बच्चू कडू, आदी उपस्थित होते. श्री संत गाडगेबाबा यांची कर्मभूमी असलेल्या आमला (ता. दर्यापूर, जि. अमरावती) या तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी एकूण 6 कोटी 79 लाखांचा प्रस्ताव सादर करण्यात आला होता. या प्रस्तावामध्ये तीर्थक्षेत्रापर्यंत पोहोच रस्ता, वाहनतळ, स्वयंपाक घर, सभागृह, नदीकाठी संरक्षण भिंत, प्रवासी निवारा, परिसराचे सौंदर्यीकरण याबरोबरच सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापन आदींच्या कामाचा समावेश आहे. तर नागरवाडी येथील तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी 18 कोटीच्या प्रस्तावाला तत्वतः मंजुरी देण्यात आली असून या प्रस्तावात काही बदल करून हा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी पुन्हा पाठविण्याचे निर्देश मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिले. 

गणपतीपुळ्यालाही निधी 
हिंगोली जिल्ह्यातील नरसी नामदेव संस्थांनच्या विकासासाठी एकूण 25 कोटी रुपयांच्या विकास आराखड्यांतर्गत पहिल्या टप्प्यात 15 कोटी रुपये देण्यासही यावेळी मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिली. यामध्ये भक्त निवास, भक्तांसाठीच्या सुविधा, घनकचरा व्यवस्थापन, पाणी पुरवठा आदींचा समावेश आहे.गणेशभक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या कोकणातील तीर्थक्षेत्र गणपतीपुळेच्या विकास आराखड्यास आज मुख्यमंत्र्यांनी मान्यता दिली. या आरखड्यातील कामांसाठी सुमारे 10 कोटींचा निधी यंदा मिळणार आहे. 

तीर्थक्षेत्राच्या विकास आराखड्यातीलकामांचा प्राधान्य क्रम ठरवून टप्प्याटप्प्याने कामे सुरू करावीत. पहिल्या टप्प्यात मंदिर परिसर व भाविकांशी संबंधित कामे करण्यात यावीत. तर दुसऱ्या टप्प्यात रस्ते, सांडपाणी व घनकचरा व्यवस्थापनाची कामे तर तिसऱ्या टप्प्यात सुशोभिकरण आदी कामे करण्यात यावीत. मंदिराचे व परिसराचे सुशोभिकरण करत असताना जे.जे. स्कूलच्या तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. 
सुधीर मुनगंटीवार, अर्थमंत्री 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT