logo
logo 
महाराष्ट्र

शासकीय कर्मचाऱ्यांची व्यथा, कोरोनाची भीती अन्‌ बदलीची धास्ती 

प्रमोद बोडके

सोलापूर : यंदा देशासह राज्यावर कोरोनाचे संकट असल्याने बदल्या होणार नाहीत, अशीच शक्‍यता वर्तविली जात होती. शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वाचा मानला जाणारा बदली हा विषय अखेर कोरोनाच्या संकटातही समोर आला आहे. दरवर्षी 31 मे अखेरपर्यंत होणाऱ्या सर्वसाधारण बदल्या यावर्षी 31 जुलैपर्यंत करण्याच्या सूचना राज्याच्या सामान्य प्रशासन विभागाने दिल्या आहेत. त्यामुळे आता कोरोनासोबतच शासकीय कर्मचाऱ्यांच्या डोक्‍यात बदलीचा विषय सुरू झाला आहे. कोणाची बदली कुठे होणार? कोण बदलीला पात्र आहे? याबाबतची चर्चा शासकीय कर्मचाऱ्यांमध्ये रंगली आहे. 

यंदा कोरोनाचे संकट असल्याने बदल्या होणार नाहीत, अशीच शक्‍यता व्यक्त केली जात होती. त्यामुळे यंदाच्या बदली प्रक्रियेबाबत शासन काय भूमिका घेते? याकडे सर्वच शासकीय कर्मचाऱ्यांचा लक्ष लागले होते. सामान्य प्रशासन विभागाने याबाबत भूमिका स्पष्ट केली असून विविध संवर्गात कार्यरत असलेल्या पदांच्या 15 टक्के प्रमाणात सर्वसाधारण बदली प्रक्रिया राबविली जाणार आहे. ही बदली प्रक्रिया 31 जुलैपर्यं करण्याच्या सूचनाही सामान्य प्रशासन विभागाने दिल्या आहेत. 

दरवर्षी एप्रिल व मे महिन्यात सर्वसाधारण बदल्या केल्या जातात. कोरोनाच्या संसर्गामुळे 2020-21 या वित्तीय वर्षात राज्याच्या कर व करेत्तर उत्पन्नात अपेक्षित महसूल घट झाली आहे. राज्याच्या अर्थव्यवस्थेवर होणारा त्याचा परिणाम विचारात घेऊन वित्त विभागाने विविध उपाययोजना सुचविल्या आहेत. कोरोना महामारीच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या विविध विभागांतर्गतच्या उपाययोजनांमध्ये सातत्य राखणे महत्त्वाचे आहे. त्यामुळे सध्याच्या वित्तीय वर्षात कोणत्याही संवर्गातील अधिकारी व कर्मचारी यांच्या बदल्या करू नये वित्त विभागाने सूचित केले होते. सामान्य प्रशासन विभागाने मात्र याबाबतची भूमिका स्पष्ट केली असून 31 मेपर्यंत केल्या जाणाऱ्या सर्वसाधारण बदल्या या 31 जुलै पर्यंत करण्याच्या सूचना सर्व विभागांना दिल्या आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT