Jitendra Awhad Esakal
महाराष्ट्र बातम्या

Jitendra Awhad: PM मोदी म्हणाले, 'मी पुन्हा येईन..', आव्हाड म्हणाले 'येणार नाहीत याची काळजी...'

१५ ऑगस्टला मी पुन्हा येईन असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेत

अंकिता खाणे (Ankita Khane)

देशाच्या 77 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (मंगळवारी) लाल किल्ल्यावरून तिरंगा ध्वज फडकवला. यानंतर त्यांनी देशाला संबोधित केलं. आपल्या भाषणात पंतप्रधान मोदींनी अनेक बाबींवर भाष्य केलं आहे. तर यावेळी त्यांनी पुढच्या १५ ऑगस्टला मी पुन्हा येईन असंही म्हटलं आहे.

त्याच्या या वक्तव्यावर राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांनी हल्लाबोल केला आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मी पुन्हा येईन असं जाहीर केलं. पण ते येणार नाहीत याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. आपण शपथ घेऊ आणि पक्ष पुढे नेऊ. साहेबांनी पक्ष बांधला शत्रू नंबर एक कोण हे मनात विचार करून ठेवा त्याचा पराभव केला पाहिजे लोकशाही सुदृढ केली पाहिजे असं यावेळी जितेंद्र आव्हाड म्हणाले आहेत.

काय म्हणाले पंतप्रधान मोदी?

2014 मध्ये मी बदल घडवून आणण्याचे आश्वासन दिले होते, असे पंतप्रधान नरेंद्र मोदींना सांगितले होते. तुम्ही देशवासीयांनी माझ्यावर विश्वास ठेवला. मी दिलेले वचन विश्वासात बदलले. 2019 मधील माझ्या कामगिरीच्या जोरावर तुम्ही मला पुन्हा आशीर्वाद दिलात. बदलामुळे मला आणखी एक संधी मिळाली. मी तुमची सर्व स्वप्ने पूर्ण करीन असंही ते पुढे म्हणाले आहेत.

2047 चे स्वप्न साकार करण्यासाठी येणारी पाच वर्षे हा सर्वात मोठा सुवर्ण क्षण आहे. पुढच्या वेळी 15 ऑगस्टला मी या लाल किल्ल्यावरून देशाचे यश आणि विकास तुमच्यासमोर मांडणार आहे. येत्या 15 ऑगस्टला पुन्हा येईल. मी फक्त तुमच्यासाठी जगतो, मी तुमच्यासाठी घाम गाळतो, कारण तूम्ही माझा परिवार आहात असंही पुढे मोदी म्हणाले आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 2nd Test: भारताची ऐतिहासिक विजयाच्या दिशेने कूच! Akash Deep चा भेदक मारा, इंग्लंडची उडवली झोप

Mumbai Airport Wildlife Smuggling : खळबळजनक! मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत तब्बल ४५ प्राणी सापडले

Central Railway: मध्य रेल्वेची ज्येष्ठांसाठी मोठी घोषणा

Rabri Devi Statement : तेजप्रताप यादव प्रकरणावर पहिल्यांदाच राबडी देवींनी सोडलं मौन अन् जाहीर कार्यक्रमात, म्हणाल्या...

लग्न न करताच ४० व्या वर्षी जुळ्या मुलांची आई होणार अभिनेत्री; म्हणाली, 'आपल्याकडे एकटी स्त्री...

SCROLL FOR NEXT