महाराष्ट्र

'उज्ज्वला'मुळे महिलांना मिळाली चुलीपासून मुक्ती

सकाळ वृत्तसेवा

मुंबई : वारी आणि वारकरी हे महाराष्ट्राच्या संस्कृतीचे वैभव असून त्यांचे अनेक प्रश्न शासनाने सोडविले आहेत, उर्वरित प्रश्नही सोडवू, अशी ग्वाही सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. तसेच प्रधानमंत्र्यांनी उज्ज्वला गॅस जोडणी योजनेतून महिलांची चुलीपासून आणि धुरापासून मुक्तता केली, असेही ते म्हणाले. 

मंत्रालयात आयोजित वारकरी संघटनांच्या प्रतिनिधींच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी वन विभागाचे प्रधान सचिव विकास खारगे, वन विभागाचे वरिष्ठ अधिकारी आणि विविध वारकरी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

हे सरकार सर्वसामान्य जनतेचे सरकार आहे असे सांगून देशमुख म्हणाले की, सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास या  प्रधानमंत्री महोदयांच्या शब्दांतच सर्व गोष्टी सामावल्या आहेत. प्रधानमंत्र्यांनी उज्ज्वला गॅस जोडणी योजनेतून महिलांची चुलीपासून आणि धुरापासून मुक्तता केली. याचा केवळ महिलांना लाभ झाला असे नाही तर यामुळे मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोडही थांबली. वेळेची बचत होण्यास मदत झाली.

शासनाने प्रत्येक कुटुंबाचा आणि कुटुंबातील सदस्यांच्या हिताचा विचार केला.जनधन  योजनेअंतर्गत गरिबांची बँक खाते उघडून त्यांना पत प्राप्त करून दिली. बँकेच्या मुख्य प्रवाहात आणल्यानंतर त्यांना मुद्रा योजनेतून उद्योग-व्यवसायासाठी कर्ज मिळू शकेल अशी व्यवस्था केली. आयुष्यमान भारत योजनेतून आरोग्यविषयक लाभ दिले. गरिबांसाठी परवडणाऱ्या घरांची योजना आणली. इतिहासात पहिल्यांदा शेतकऱ्यांना २४ हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्यात आली.

शेतकरी हा आपला अन्नदाता आहे, जगाचा पोशिंदा आहे त्याला सन्मान देणाऱ्या अनेक योजना या शासनाने राबविल्या. शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी व्हावा, त्याच्या शेतमालाला योग्य भाव मिळावा यासाठी प्रयत्न केला. या शासनाने शेतमालाला दीडपट हमीभाव दिला. हरभरा, तूर सारख्या पिकांसाठी भावांतर योजनेतून मोठी रक्कम  शेतकऱ्यांना दिली तीही त्यांच्या थेट बँक खात्यात.

जलयुक्त शिवार योजनेमुळे ७० टक्के पाऊस होऊनही आपण कृषी उत्पादन वाढवू शकलो. मुख्यमंत्र्यांनी मिशन म्हणून या योजनेतून पडणाऱ्या पावसाचा प्रत्येक थेंब अडवण्याचा प्रयत्न केला. वारकऱ्यांनी आपल्या संत पंरपरेने घालून दिलेला वृक्षलागवडीचा संस्कार जनमानसात रुजवावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT