Sanjay Raut and satyapal malik 
महाराष्ट्र बातम्या

Pulwama Attack : संजय राऊत घेणार सत्यपाल मलिकांची भेट; म्हणाले देशाची सुरक्षा...

रवींद्र देशमुख

मुंबई : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा हल्ल्यासह अनेक मुद्द्यांवर खळबळजनक खुलासे केले होते. यावरून देशात राजकीय खळबळ उडाली आहे. यावरून विरोधी पक्षांनी भाजपवर हल्लाबोल केला आहे. त्यातच उद्धव ठाकरे गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी सत्यपाल मलिक यांची भेट घेणार असल्याचं म्हटलं.

संजय राऊत म्हणाले की, गरज मी दिल्लीमध्ये अनेक भेटीगाठी घेणार आहे. त्यात जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांना भेटणार आहे. पुलवामाबाबत त्यांनी जे काही खुलासे केले आहेत, ते राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. तो संपूर्ण विषय देशात पोहचू नये, यासाठी माध्यमांवर दबाव आणण्यात आला. पुलवामा हत्याकांडात काही गरबड असेल तर तो विषय वेगळ्या पद्धतीने जास्तीत जास्त देशात जायला हवा, असं राऊत यांनी म्हटलं.

सत्यपाल मलिक हे महत्त्वाचे नेते आहेत. ते सध्या सक्रिय आहेत, राजकारणात. देशाच्या पुढील राजकारणात त्यांची काय मदत होऊ शकते, हे समजून घेणं आवश्यक आहे. आमचा आणि त्यांचा संवाद अनेक दिवसांपासन सुरू आहे. त्यामुळे दिल्लीत त्यांना भेटणार आहे, असं राऊत यांनी म्हटलं.

सत्यपाल मलिक यांनी आरोप केला होता की पुलवामा दुर्घटना केंद्राच्या चुकीमुळे घडली होती. कारण केंद्र सरकारकडून सैन्याला हवाई वाहतूक करण्यास नकार देण्यात आला होता. त्यामुळे काँग्रेस आणि आप नेत्यांनीही याप्रकरणी केंद्र सरकारला घेरले आहे.


सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT