Water Cup 
महाराष्ट्र बातम्या

महाराष्ट्र येत्या दोन वर्षांत दुष्काळमुक्त होऊ शकतो: फडणवीस

स्वप्नील जोगी

पुणे : "जल, जंगल आणि जमीन यांचे संरक्षण केल्यास महाराष्ट्र येत्या दोन वर्षांत नक्कीच दुष्काळमुक्त होऊ शकतो. 'गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार' हे येत्या काळात निर्माण करणे आवश्यक आहे. तसे घडल्यास पुन्हा कधीही कर्जमाफी करायची गरजच राहणार नाही," असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी केले.

पानी फाऊंडेशनच्या वतीने आयोजित वॉटर कप २०१७ स्पर्धेचे पारितोषिक वितरण फडणवीस यांच्या हस्ते झाले. अभिनेता शाहरूख खान, राज्याचे जलसंपदा राज्यमंत्री राम शिंदे, फाऊंडेशनचे सत्यजित भटकळ, रिलायन्स फाऊंडेशनच्या प्रमुख नीता अंबानी, महापौर मुक्ता टिळक या वेळी उपस्थित होते. पानी फाऊंडेशनचे संस्थापक आमिर खान व किरण राव हे स्वाईन फ्ल्यूने आजारी असल्यामुळे त्यांनी व्हिडियो कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.

या वेळी माण (जि. सातारा) तालुक्यातील बिदाल आणि केज (जि. बीड) तालुक्यातील पळसखेडा या गावांना २० लाख रुपयांचे तिसऱ्या क्रमांकाचे बक्षीस विभागून देण्यात आले. खटाव (जि.सातारा) तालुक्यातील भोसरे आणि धारूर (जि.बीड) तालुक्यातील जायभायेवाडी या गावांना ३० लाख रुपयांचे दुसरे बक्षीस विभागून देण्यात आले. तर आर्वी (जि. वर्धा) तालुक्यातील काकडदरा या गावाला ५० लाख रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले.

फडणवीस म्हणाले, " मनात आणल्यावर एखादा माणूस काय करू शकतो, हे आमिर खान यांनी पानी फाऊंडेशनच्या माध्यमातून दाखवून दिले आहे. तर सर्वांनी एकजुटीने काम केल्यास काय होऊ शकते, हे तुम्ही दाखवून दिले आहे. वॉटर कपने जलयुक्त शिवारला नवे स्वरूप दिले आहे आणि महाराष्ट्रात नवी क्रांती आणली आहे. महाराष्ट्रात पाण्यापेक्षा मोठे काम असू शकत नाही."

शाहरुख-आमिरच्या 'फ्रेंडशिप'सोबतच रंगला 'पाण्याचा आनंदसोहळा' !
बॉलिवूडचे सुपरस्टार म्हणून गेली अनेक वर्षं एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असणारे आणि लोकप्रिय खान त्रयीतील दोन खंदे वीर असणारे शाहरुख आणि आमिर... आपापल्या चाहत्यांची दोन स्वतंत्र अन समृद्ध बेटं मिरवणाऱ्या या दोघांमधला मैत्रीचा अनोखा धागा रविवारी पुण्यात 'फ्रेंडशिप डे'च्याच दिवशी उलगडलेला पाहायला मिळाला... आजारी असल्याने सोहळ्याला उपास्थित न राहू शकणाऱ्या आमिरने शाहरुखला खास आपल्या अनुपस्थितीत पुण्यास जाण्याची विनंती केली आणि शाहरुखने सुद्धा ती लगेच मान्य केली. शाहरुखने मित्र आमिरच्या कामाचे कौतुकही केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thar Accident सोमवारी पुण्याहून कोकणात जायला निघाले, गुरुवारी ताम्हिणी घाटातल्या दरीत थारसह ६ मृतदेह दिसले; कधी आणि काय घडलं?

भारतीय जवानाचं शिरच्छेद करून मुशर्रफसमोर ठेवलं, काय आहे किस्सा? ‘धुरंदर’मध्ये अर्जुन रामपाल साकारणार त्या राक्षसाचा चेहरा

Chief Minister Security : कोणत्या मुख्यमंत्र्यांना आहे जबरदस्त सुरक्षा कवच अन् जाणून घ्या, नितीश कुमारांची सुरक्षा कशी?

Tamhini Ghat Accident : ताम्हिणी घाटात मोटार खोल दरीत कोसळली, चार मृतदेह हाती; मृतांची नावे समोर, सर्वजण पुण्यातील

Latest Marathi News Update LIVE : अमरावतीत काँग्रेसची आढावा बैठक; तीनही नगरपरिषद जिंकण्याचा कार्यकर्त्यांचा निश्चय

SCROLL FOR NEXT