Eknath Shinde News
Eknath Shinde News esakal
महाराष्ट्र

Eknath Shinde : राहुल गांधींनीच देशद्रोह केला, मुख्यमंत्री शिंदेंचा 'नेमका' प्रहार

सकाळ डिजिटल टीम

मुंबईः राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आज संपलं आहे. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिवेशनादरम्यान घेण्यात आलेल्या निर्णयांची माहिती दिली.

सुरुवातीला बोलतांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्याला विकासाकडे नेणारं बजेट मांडण्यात आलेलं आहे. अधिवेशनामध्ये लोकहिताचे निर्णय घेता आले, ही महत्त्वाची बाब आहे. विरोधी पक्षनेत्याकडे दोन पर्याय असतात. पहिला गडबड गोंधळ घालायचा आणि चर्चा बंद पाडायची. आणि दुसरा चर्चा घडवून आणून प्रश्न तडीस न्यायचे. मुळातमध्ये यावेळी सभागृह निट चाललं, हा महत्त्वाचा मुद्दा आहे.

हेही वाचाः एका मुलाखतीतून उलगडलेले भैरप्पा!

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, अडीच वर्षामध्ये दोन-चार दिवस अधिवेशन झालं होतं. परंतु या अधिवेशनात विविध विषयांना न्याय मिळाला. महिलांसाठी अनेक निर्णय अर्थसंकल्पामधून घेण्यात आले आहेत. शिवाय मांडण्यात आलेल्या सर्व विधेयकांवर चर्चा झाली. एकंदरीत हे अधिवेशन सर्व अंगाने यशस्वी झाल्याचं मुख्यमंत्री म्हणाले.

राहुल गांधी यांच्याविषयी बोलतांना मुख्यमंत्री म्हणाले की, मोदींवर बोलण्याचा राहुल गांधींना अजिबात अधिकार नाही. राहुल यांनी मोदी आडनावावर बोलून सबंध ओबीसी समाजाचा अवमान केला आहे. मोदीजी बारा महिने आणि २४ तास काम करत आहेत. दुसरीकडे राहुल गांधी हे देशाबाहेर जावून देशाचा अपमान करत आहेत. हाच मुळात देशद्रोह आहे, असं म्हणून त्यांनी राहुल गांधींवर आरोप केले.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Elections 2024 : केजरीवालांच्या भविष्यवाणीवर अमित शाहांचं उत्तर; म्हणाले, संविधानात कुठे लिहिलंय की मोदी...

James Anderson Retirement : बाजूला होण्याची हीच योग्य वेळ... जेम्स अँडरसनने पोस्ट करून सांगितला निवृत्तीचा प्लॅन

Latest Marathi News Live Update: लोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात देशभरात ६५.६८ टक्के मतदान

मावळमध्ये कोणाचा मुलगा पडला? मुलीलाही निवडून आणता आलं नाही म्हणणाऱ्या अजित पवारांना बजरंग सोनवणेंचे प्रत्युत्तर

Asaduddin Owaisi: "इथं जन्मलो, इथंच मरणार, देशातून पुन्हा..."; ओवैसींचा मोदी-शाहांवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT