महाराष्ट्र बातम्या

Coronavirus: रेल्वेची 18 दिवसांत अडीच लाख तिकिटे रद्द ! 

सकाळवृत्तसेवा

पुणे - कोरोनाच्या उद्रेकामुळे तब्बल दोन लाख 55 हजार प्रवाशांनी मध्य रेल्वेच्या पुणे विभागातून गेल्या 18 दिवसांत प्रवासाचे बेत रद्द करून तिकिटांचा परतावा घेतला आहे. त्यांना सुमारे 15 कोटी रुपयांचे वाटप केले आहे. उन्हाळ्यात परीक्षा संपल्यावर रेल्वेच्या गाड्यांना गर्दी होते. त्याची सुरुवात मार्चपासूनच होते. त्यासाठी आरक्षण दोन-तीन महिन्यांपासूनच केले जाते. मात्र, देशातही कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने पुणे विभागातील प्रवाशांनी प्रवासाचे बेत रद्द केले. 

पुण्यावरून प्रवाशांनी रद्द केलेली तिकिटे ः 
नागपूर, सिकंदराबाद, भुसावळ, दरभंगा, जम्मूतावी झेलम, एर्नाकुलम एक्‍स्प्रेस 

तिकीट रद्द करणाऱ्या शहरातील प्रवासी ः 
पुणे, सातारा, बारामती, मिरज, कोल्हापूर 

- यंदा 11 ते 18 मार्च आरक्षण न केलेली तिकिटे रद्द ः 24 टक्के 
- पुणे विभागात गेल्या 18 दिवसांत उत्पन्नात घट ः 60 टक्के 
- गेल्यावर्षी 1 ते 18 मार्चदरम्यान तिकीट रद्द केलेले प्रवासी ः एक लाख 43 हजार 
- गेल्यावर्षी 18 दिवसांत प्रवाशांना दिलेला परतावा ः नऊ कोटी 55 लाख 

एका दिवसांत 23 हजार तिकिटे रद्द ! 
रेल्वेच्या पुणे विभागाच्या इतिहासात एका दिवसांत विक्रमी तिकिटे रद्द होण्याचा प्रसंग 18 मार्च रोजी घडला. या दिवशी सुमारे 23 हजार तिकिटे रद्द झाली. त्यांना सुमारे एक कोटी 35 लाख रुपयांचा परतावा दिल्याची माहिती रेल्वेतील सूत्रांनी दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Land Scam: उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निर्णय! शीतल तेजवानीला जामीन मंजूर; पुण्यातील मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण

Satej Patil Mushrif Abitkar Meetting : 'गोकुळ' दुधाचा चहा अन् मुश्रीफ, अबिटकर, बंटी पाटलांची बैठक; शिवाजी विद्यापिठात राजकीय टोमणेबाजी

Nagpur: चिंताजनक; धरणांमध्ये केवळ ३५ टक्के जलसाठा;कमी पाऊस व मॉन्सूनला विलंबाची शक्यता, पाणी जपून वापरण्याची गरज

Gadchiroli: २० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर गोकुळनगरतील रस्त्याची मागणी पूर्ण; नागरिक आनंदले; नगराध्यक्षांचा पुढाकार, उपाध्यक्षांनी केला पाठपुरावा

फक्त महाराष्ट्रातच नाही तर भारतातही गौतमीची क्रेझ ! "हिल पोरी हिला" गाणं होतंय युट्युबवर ट्रेंड

SCROLL FOR NEXT