Raj Thackeray Sakal
महाराष्ट्र बातम्या

Raj Thackeray : दंड ठोठावत परळी न्यायालयाकडून राज ठाकरेंबाबत मोठा निर्णय

राज ठाकरेंना 2008 मध्ये एका प्रकरणात मुंबईत अटक करण्यात आली होती.

सकाळ डिजिटल टीम

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज परळी दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यात राज यांच्याबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.

हेही वाचा : दुधदुभते मुबलक हवे....मग हे नक्कीच वाचा

चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी राज ठाकरेंविरोधात जारी करण्यात आलेल्या अटक वॉरंट संदर्भात परळी न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे.

न्यायालयाच्या या निर्णयामुळे राज ठाकरेंना मोठा दिलासा मिळाला आहे. या प्रकरणावर आज सुनावणी पार पडली. त्यावेळी न्यायालयाने राज ठाकरेंविरोधात जारी केलेले अटक वॉरंट रद्द करण्याचे आदेश दिले आहेत.

नेमकी घटना काय?

राज ठाकरेंना 2008 मध्ये एका प्रकरणात मुंबईत अटक करण्यात आली होती. याचे पडसाद बीडमधील परळीत उमटले होते. त्यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी बसवर दगडफेक केली होती.

त्यानंतर कार्यकर्ते आणि चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी राज ठाकरेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

त्यानंतर राज ठाकरे हजर न राहिल्याने त्यांच्याविरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी करण्यात आले होते.

दोनवेळा राज यांना परळी न्यायालयात हजर राहण्यास सांगण्यात आले होते. मात्र, १२ जानेवारीला राष्ट्रमाता जिजाऊ जयंती असल्यामुळे न्यायालयाने तारीख वाढवून दिली होती.

त्यानुसार आज राज ठाकरे परळी न्यायालयात हजर झाले होते. यावेळी राज यांच्याकडून न्यायालयाला अटक वॉरंट रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

राज यांची ही मागणी न्यायालयाकडून राज यांना ५०० रुपयांचा दंड ठोठावत जारी करण्यात आलेले अटक वॉरंट रद्द केला.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT