राजर्षी शाहू महाराज  sakal
महाराष्ट्र बातम्या

Rajarshi Shahu Maharaj : मुलाच्या मृत्यूनंतर ऐश्वर्याचा त्याग केला; कसे होते शाहू महाराजांचे शेवटचे दिवस

शारिरीक आणि मानसिक अस्वास्थ्याच्या काळातही त्यांनी आपलं काम सुरूच ठेवलं.

वैष्णवी कारंजकर

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचं वयाच्या अवघ्या ४८ व्या वर्षी निधन झालं. आज शाहू महाराजांची पुण्यतिथी आहे. त्यांच्या शेवटच्या काळात त्यांनी सोसलेल्या शारिरीक मानसिक वेदनांविषयी 'राजर्षी शाहू छत्रपती महाराज' या पुस्तकात लिहिलं आहे.

ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार यांनी शाहू महाराजांच्या अखेरच्या दिवसांबद्दल लिहिलं आहे. बलदंड शरीरयष्टी असलेल्या शाहू महाराजांना त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये मधुमेह आणि हृदयविकाराचा त्रास सुरू झाला होता. त्यातच आपला धाकटा मुलगा प्रिन्स शिवाजी यांच्या निधनामुळे ते खचले होते.

त्यामुळे त्यांनी राजवाड्यातल्या ऐश्वर्याचा त्याग केला. आणि सोनतळी आश्रमात ते संन्याशाप्रमाणे राहत होते. अशा शारिरीक आणि मानसिक अस्वास्थ्याच्या काळातही त्यांनी आपलं काम सुरूच ठेवलं.

शाहू महाराजांचे दौरे, कार्यक्रमांना जाणे, शिवाय शोषित, वंचितांसाठीचं काम सुरूच ठेवलं. मात्र प्रकृती खालावत होती. असं असतानाही ते बडोद्याला महाराजा सयाजीराव गायकवाड यांच्या नातीच्या लग्नाला हजर राहिले. या लांबच्या प्रवासामुळे त्यांची तब्येत आणखी खालावली. तिकडून परतत असताना ते मुंबईत थांबले आणि ५ मे १९२२ रोजी त्यांचा हृदयविकार आणखी बळावला आणि ६ मे रोजी पहाटे सहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup 2025: 'श्रेयस, जैस्वाल, सिराज पाकिस्तानमध्ये असते, तर...' भारतीय संघातून वगळल्यानंतर माजी क्रिकेटपटूचं मोठं विधान

Thane News: काँग्रेस नेत्यांवर थेट आरोप! माजी नगरसेवकांचा पक्षत्याग, भाजपात प्रवेश करत नाराजी उघड केली

गिरीश ओक-निवेदिता सराफची जोडी पुन्हा पहायला मिळणार, 'बिन लग्नाची गोष्ट'सिनेमाचा ट्रेलर प्रदर्शित, प्रिया बापट आणि उमेश कामतची गोड केमिस्ट्री

Maharashtra Latest News Update: राष्ट्रीय महामार्गांवर दुचाकी वाहनांना टोल नाही, NHAI चे अधिकृत स्पष्टीकरण

Soldier caught pigeon on border : भारत-पाकिस्तान सीमेजवळ जवानांनी पकडलं एका गंभीर धमकीच्या पत्रासह कबुतर!

SCROLL FOR NEXT