rajesh tope sakal
महाराष्ट्र बातम्या

OBC आरक्षणाशिवाय निवडणुका नको, 'माविआ'त खलबतं सुरू

सकाळ डिजिटल टीम

महाराष्ट्रात ओबीसी आरक्षण रद्द झाल्यापासून राजकीय खलबलं सुरू झाली आहेत. जानेवारी महिन्यात राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत. यासाठी राज्य सरकारने ओबीसी समाजाला 27 टक्के आरक्षण लागू केलं होतं. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने यावर स्थगिती आणली आहे. ऐन निवडणुकांच्या आधी हा निर्णय आल्याने राज्य सरकारच्या अडचणीत वाढ झाल्याचं बोललं जातंय.

यासंदर्भात राज्यातील ओबीसी नेत्यांनी नाराजी दर्शवली आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना यासंदर्भात पत्र लिहिलं आहे. ओबीसी आरक्षण लागू केल्याशिवाय निवडणूक नको, अशी मागणी त्यांनी यामार्फत केलीय.

सध्या जाहीर झालेल्या निवडणुकीलाही स्थगिती द्यावी, असं त्यांनी पत्रात नमूद केलं आहे. ओबीसी आरक्षण शिवाय निवडणूक नको, या भूमिकेवर महाविकास आघाडी सरकारमधील नेते राजी असल्याचं समोर येतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Election: नव्या प्रभाग रचनेमुळे १६ प्रभागांमध्ये गडबड; ६४ नगरसेवकांवर थेट परिणाम; 'या' पक्षांना बसणार फटका

Latest Marathi News Updates: मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो... - सुप्रिया सुळेंचं विधान!

अनधिकृत बांधकामधारकांना उच्च न्यायालयाचा दणका! आता पाच मजली अनधिकृत इमारतीवर बुलडोझर चालणार

विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशाची शेवटची संधी! सोमवारी जाहीर होतील रिक्त जागा; प्रवेशासाठी २९ व ३० ऑगस्टपर्यंत मुदत, वाचा...

Mumbai Goa Highway: गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांची गर्दी! मुंबई-गोवा महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा

SCROLL FOR NEXT