rajesh tope rajesh tope
महाराष्ट्र बातम्या

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा सध्या धोका नाही: राजेश टोपे

माधव इतबारे

औरंगाबाद : कोरोना संसर्गाची (Corona Infection) राज्यातील स्थिती सध्या नियंत्रणात आहे. सप्टेंबरमध्ये तिसरी लाट येऊ शकते, या संदर्भात नीती आयोगाने (Niti Ayog) दिलेला अहवाल जून महिन्यातील आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health Minister Rajesh Tope) यांनी सोमवारी (ता. २३) केले.राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाअंतर्गत महापालिकेच्या (Aurangabad) सिल्कमिल कॉलनी येथील आरोग्य केंद्रातील डिजिटल एक्स-रे मशीनचे सोमवारी टोपे यांच्या हस्ते लोकार्पण झाले. त्यानंतर पत्रकारांसोबत बोलताना ते म्हणाले, कोरोना संसर्गाची तिसरी लाट सप्टेंबरमध्ये येईल. त्यात एका दिवसात पाच ते सहा लाख जणांना कोरोनाची बाधा होऊ शकते, असे सूतोवाच नीती आयोगाच्या अहवालात होते. पण हा अहवाल जून महिन्यातील आहे. नव्याने कुठलाही अहवाल आलेला नाही. परंतु या अहवालानंतर राज्य शासनाने (Maharashtra) संपूर्ण तयारी केली केली आहे. ऑक्सिजन, औषधी खरेदी, डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.

खर्चासाठी अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद केली आहे. त्यामुळे राज्य सरकार तिसऱ्या लाटेचा मुकाबला करण्यासाठी सज्ज आहे. राज्यातील लसीकरण मोहिमेला वेग देण्याची गरज असून राज्याने एकाच दिवसात साडेदहा लाख लोकांच्या लसीकरणाचा विक्रम केला आहे. आम्ही पंधरा लाखापर्यंत दररोज लसीकरण करण्याची तयारी केली आहे. परंतु केंद्राकडून लसीचा पुरवठा नियमित होत नसल्याने या कामाला ब्रेक लागत असल्याचेही टोपे म्हणाले.

फडणवीसांकडे वेळ नसावा

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राकडून मुबलक प्रमाणात राज्याला लस मिळवून देण्यासाठी सोबत दिल्लीला येण्याचे आश्वासन दिले होते. माझे फडणवीस यांच्याशी फोनवर बोलणे झाले आहे. पण सध्या ते व्यस्त असल्यामुळे कदाचित त्यांना वेळ मिळत नसावा. पण आम्ही मुबलक लस साठा मिळावा यासाठी त्यांची मदत निश्चित घेणार आहोत, असेही टोपे यांनी स्पष्ट केले.

राजकीय पक्षांनी जबाबादारी पाळावी

राज्यावर कोरोनाचे संकट कायम असताना भाजपची जनआशीर्वाद यात्रा सुरू आहे. त्यावर सरकार काही कारवाई करणार का, यावर टोपे म्हणाले, कोरोनाचा धोका कायम असल्याचे सरकारने स्पष्ट करून अशावेळी घ्यावयाची काळजी, जाहीर कार्यक्रम, लग्न समारंभ या बाबतची नियमावली जाहीर केली आहे. ती पाळण्याची जबाबदारी सर्वसामान्यांची आहे, तशीच ती राजकीय पक्षांचीही आहे. सगळ्याच राजकीय पक्षांनी याचा विचार केला पाहिजे. कारवाई संदर्भात निर्णय मुख्यमंत्री घेतील.

आरोग्य कर्मचारी भरती लवकरच

लवकरच राज्यात आरोग्य कर्मचारी भरती करण्यात येणार आहे. तसेच कोरोना प्रतिबंधासाठी औषधी व लसीकरण चे नियोजन सुरू आहे, यामुळे नागरिकांना काळजी करण्याचे कारण नाही, असे टोपे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shubman Gill: 'किंग' कोहलीकडून 'प्रिन्स'चं भरभरून कौतुक! म्हणाला, 'स्टार बॉय, तू इतिहास...'

Latest Maharashtra News Live Updates: पंचवटीमध्ये मुसळधार पावसानंतर गोदावरी नदीच्या पाणीपातळीत वाढ.

Weekly Horoscope: या आठवड्यात गुरु-आदित्य योगामुळे 'या' 5 राशींवर धनवर्षा, बँक खात्यात होईल मोठी भर, जाणून घ्या तुमचं करिअर राशीभविष्य

Maharashtra Rain News: राज्यात पुढचे ४ दिवस मुसळधार, पहा कुठे -कोणता अलर्ट? | Weather Alert

Video : “...अन् साक्षात पांडुरंगाचं दर्शन झालं”, पंढरपूरला निघालेल्या दिव्यांग आजोबांचा वारीतला व्हिडिओ पाहून शॉक व्हाल..

SCROLL FOR NEXT