Swabhimani Shetkari Sanghatana Raju Shetti esakal
महाराष्ट्र बातम्या

Raju Shetti : 'राज्यातलं शिंदे-फडणवीस-पवार सरकार लुच्चे, त्यांना शिवरायांचं नाव घेण्याचा अधिकार नाही'

शेतकऱ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. असे हातावर हात ठेवून जर थांबलात तर येणारे दिवस वाईट असल्याचा इशारा त्यांनी दिला.

विजय लोहार

शेतकऱ्यांचे शोषण करणाऱ्या या सरकारला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेण्याचा अधिकार नसल्याचा उपरोधिक टोला शेट्टी यांनी लगावला.

नेर्ले : आजचे सरकार लुच्चे, फसविणारे असून आपणाला ही व्यवस्था तोडून काढावी लागेल. शोषणमुक्त शेतकरी करण्यासाठी तुम्ही मला साथ द्या, असं आवाहन राजू शेट्टी यांनी केलं.

पंतप्रधान मोदी, शिंदे, अजित पवार व फडणवीस यांना महाराष्ट्राचा विकास करण्याचा खूप ध्यास लागला असून शेतकऱ्यांचे शोषण करणाऱ्या या सरकारला छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेण्याचा अधिकार नसल्याचा उपरोधिक टोलाही शेट्टी यांनी लगावला.

ते (Raju Shetti) नेर्ले (ता. वाळवा) येथील विलासराव मल्टिपर्पज हॉलमध्ये स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने घेण्यात आलेल्या ‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी जनजागृती अभियानां’तर्गत आयोजित सभेत बोलत होते.

यावेळी ज्येष्ठ नागरिक ए. आर. पाटील अध्यक्षस्थानी होते. मार्गदर्शक रावसाहेब पाटील, स्वाभिमानीचे तानाजी साठे, अशोक बल्लाळ, स्वाभिमानीचे राज्य प्रवक्ते एस. यू. संदे, भागवत जाधव, रमेश पाटील, प्रभाकर पाटील, एकनाथ निकम, हणमंत कुंभार, शिवाजी पाटील, जगन्नाथ भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार शेट्टी म्हणाले, ‘‘किल्ले रायगडावरून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रेरणेने शेतकरी जनजागृती अभियानाला सुरवात केली आहे. शंभर रुपयांची एफआरपी वाढवून मोदी सरकार स्वतःची पाठ थोपटून घेत आहे. परंतु ऊस शेतीसाठी प्रत्यक्ष खर्च सोडला तर शेतकऱ्यांच्या हातामध्ये काहीच राहत नाही.’’

शेतकऱ्यांनी एकत्र येणे गरजेचे आहे. असे हातावर हात ठेवून जर थांबलात तर येणारे दिवस वाईट असल्याचा इशारा त्यांनी दिला. बांधावर बसून मी जो दर सांगेल तोच दर कारखान्याने द्यावा, अशी धमक शेतकऱ्यांमध्ये तयार होणे गरजेचे आहे.

तलाठी, तहसीलदार, प्रशासन अधिकारी तुमच्या पैशातून पगार घेतात, तरीसुद्धा चिरीमिरीसाठी हात पसरतात. विकासकामे, रस्ते, पायाभूत सुविधा या तुमच्याच पैशातून होत आहे. मंत्री ठेकेदाराकडून दहा ते पंधरा टक्के घेतात आणि विकास कामे आम्हीच केली, असे छाती बडवून सांगतात. तेलंगणामधील बी. आर. एस.चे मंत्रिमंडळ पंढरपूर मध्ये आपल्या संपत्तीचे प्रदर्शन करण्यासाठी आले होते का?

शेट्टींची सावध भूमिका

आजच्या राजकीय परिस्थितीवर पत्रकारांनी प्रश्न विचारल्यानंतर राजू शेट्टी म्हणाले, आताच्या राजकारणाचा दर्जा घसरला असून उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची बाजू खंबीरपणे मांडली नाही. स्वतःचे हित साधले जात आहे. तुम्ही कुणाला सोबत घेऊन लढणार का, या प्रश्नावर, मी कुणालाही सोबत घेऊन लढणार नाही. स्वाभिमानी पक्षातूनच मी लढणार असल्याची सावध भूमिका त्यांनी मांडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana eKYC Deadline Extension: मोठी बातमी! लाडक्या बहिणींना सरकारकडून दिलासा; अखेर eKYC साठी जाहीर केली मुदतवाढ

Crime: सासरा आणि सूनेचं प्रेम जडलं; अडसर ठरणाऱ्या मुलाचा काटा काढला, मात्र एका चुकीनं बाप पोलिसांच्या जाळ्यात अडकला

Kannad Nagarparishad Election : कन्नडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप यांचा युतीचा फॉर्म्युला ठरला; जिल्हाध्यक्ष संजय खंबायते यांची माहिती

Dharur Nagarparishad Election : धारूर नगरपरिषदेत चौरंगी लढत रंगणार! अध्यक्षपदासाठी १६, तर नगरसेवक पदासाठी तब्बल १५१ नामनिर्देशन पत्र दाखल

Latest Marathi Breaking News: देश-विदेशासह राज्यात दिवसभरात काय घडलं? वाचा एका क्लिकवर

SCROLL FOR NEXT