Shivsena Uddhav Thackeray Ramdas Athawale Sakal
महाराष्ट्र बातम्या

Shivsena Row : उद्धव ठाकरे कोणत्याही कोर्टात गेले तरी त्यांना न्याय मिळणार नाही - रामदास आठवले

शिवसेना ही एकनाथ शिंदे यांची आहे ते active असणारे मुख्यमंत्री आहेत, असंही आठवले म्हणाले.

सकाळ डिजिटल टीम

राज्यातल्या सत्तासंघर्षावर सध्या सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. मात्र हा सत्तासंघर्ष नाही, सत्ता शिंदे- फडणवीसांना मिळाली आहे, असं मत केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केलं आहे. उद्धव ठाकरेंना कुठल्याही कोर्टात न्याय मिळणार नाही, असंही आठवले म्हणाले आहेत.

रामदास आठवले पुण्यात माध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी सत्तासंघर्षाच्या सुनावणीवर भाष्य केलं आहे. आठवले म्हणाले, "हा सत्तासंघर्ष नाही. सत्ता शिंदे-फडणवीस यांना मिळाली आहे. निवडणूक आयोगाने निर्णय दिला आहे. उद्धव ठाकरे आता कुठल्याही कोर्टात गेले तरी त्यांना न्याय मिळणार नाही. जनतेच्या दरबारात गेले तरीसुद्धा त्यांना न्याय मिळणार नाही. न्याय आम्हालाच मिळेल. शिवसेना ही एकनाथ शिंदेंची आहे, ते Active असणारे मुख्यमंत्री आहेत."

हेही वाचा - कॅशबॅक किंवा खरेदीवर सूट मिळणारंच कार्ड निवडा...

कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीबद्दलही त्यांनी भाष्य केलं आहे. या निवडणुकांमध्ये पैसे वाटल्याचा आरोप झाला, त्यावरही आठवले यांनी उत्तर दिलं आहे. आठवले म्हणाले, "नियम भंग झाल्याची जी तक्रार आहे, त्यावर कारवाई होईल. मला खात्री आहे, दोन्ही ठिकाणी भाजपा निवडून येईल. पैसे वाटले गेले असतील तर पैसे वाटणे ही आमची संस्कृती नाही."

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT