Ramdas Athawale sakal media
महाराष्ट्र बातम्या

आठवले म्हणतात,भाजपसोबत आरपीआय असताना मनसेची काय आवश्यकता?

सकाळ डिजिटल टीम

कल्याण : केंद्रीय मंत्री रामदास आठवले सध्या आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत आहेत. त्यांनी म्हटलंय की, भाजप, शिवसेना आणि आरपीआय हे महायुतीचे सरकार पुन्हा येऊ शकते. एकत्र बसून यावर चर्चा होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. तसेच त्यांनी म्हटलंय की, भाजपसोबत आरपीआय असताना मनसेची काय आवश्यकता आहे? ते कल्याण पूर्वेत ज्येष्ठ समाजसेवक देवचंद आंबादे याच्या वाढिवसानिमित्त आले होते.

पुढे त्यांनी म्हटलंय की, एवढी वर्षे सत्तेमध्ये असूनही काँग्रेसला जातीवाद संपवता आला नाहीये. राज ठाकरे यांनी परवा जे पुण्यात वक्तव्य केलंय की राष्ट्रवादीच्या उदयानंतर जातीयवाद वाढला, त्याबद्दल ते म्हणाले की, दलितांवर अत्याचार झाला तर तो राष्ट्वादी कडून होत आहे, याची माहिती त्यांना मिळाली असेल म्हणून त्यांनी तसा आरोप केला असेल. पुढे ते म्हणाले की, मनसे आणि भाजपची युती होणे अश्यक्य आहे. कारण भाजपसोबत आरपीआय असताना मनसेची आवश्यकता नाही. तसेच येणाऱ्या मुबंई महापालिका निवडणुकीत भाजप-आरपीआय जिंकेल. त्यामुळे मनसेची आवश्यकता नाहीये. येणाऱ्या केडीएमसी पालिका निवडणुकीत आरपीआय भाजप सोबत राहील, असंही त्यांनी म्हटलंय.

2024 ला देशात भाजप-रिपब्लिकन पक्षाचं सरकार

याआधी साताऱ्यात शासकीय विश्रामगृहात पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी एक मोठं भाकित केलं होतं. त्यांनी म्हटलं होतं की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीत एकत्र येण्यासंदर्भात चर्चा झाली असेल. यामध्ये पाच वर्षे शिवसेनेचा मुख्यमंत्री रहावा, उपमुख्यमंत्रीपद भाजपला द्यावे या पध्दतीची चर्चाही झाली असेल. शिवसेना व भाजप एकत्र येऊन सत्ता स्थापन करण्याचा प्रयोग होत असेल, तर त्याचा विचार उद्धव ठाकरेंनी करावा, असा सल्ला केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी दिला. दरम्यान, मोदींविरोधात कोणी कितीही कट कारस्थान केले तरी मोदींना कोणीही अडवू शकत नाही. आगामी २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत देशात पुन्हा भाजप व रिपब्लिकन पक्षाचेच सरकार सत्तेत येईल, असे भाकित त्यांनी केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nagpur News : कविकुलगुरू कालिदास संस्कृत विद्यापीठाच्या कुलगुरूंचं अपघाती निधन, पत्नीचाही मृत्यू; मूळ गावी जाताना घडली घटना

Latest Marathi News Updates : कोल्हापुरात रात्री झालेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर पोलिसांची दोन्ही समाजांसोबत बैठक

Chhagan Bhujbal : लिंगायत समाजातील पोटजातींचा लवकरच ओबीसींमध्ये समावेश; मंत्री छगन भुजबळ यांचे प्रतिपादन!

"म्हणून मी वडिलांचं टॅक्सी चालवणं बंद केलं.." ती आठवण सांगताना ढसाढसा रडले भरत जाधव; जुना VIDEO चर्चेत

Rohit Sharma नवी लँबॉर्गिनी घेऊन निघाला, मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये अडकला; फॅनने पाहताच पाहा कशी दिली रिअ‍ॅक्शन

SCROLL FOR NEXT