Opposition leader Devendra Fadnavis  sakal
महाराष्ट्र बातम्या

जलयुक्त शिवारला क्लीन चीट मिळाल्यानंतर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : देवेंद्र फडणवीसांच्या जलयुक्त शिवार योजनेवर (Jalyukt shivar scheme) कॅगने काही आक्षेप घेतले होते. त्यानंतर चौकशीसाठी महाविकास आघाडी (mahavikas aghadi government) सरकारने एक समिती स्थापन केली होती. आता या समितीने जलयुक्त शिवार योजनेप्रकरणी तत्कालीन फडणवीस सरकारला क्लीन चीट (clean chit to jalyukt shivar scheme) दिली आहे. त्यानंतर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

''जलयुक्त शिवार योजनेमध्ये काही तक्रारी नक्की असू शकतात. मी न्यायालयात एक रिपोर्ट दिला होता. त्यानुसारच हा अहवाल आला असावा. ६०० वेगवेळ्या तक्रारी होत्या. त्याबाबत चौकशी होईल, असे मी स्वतः म्हटले होते. चुकीच्या गोष्टींची चौकशी व्हायला पाहिजे. त्याला माझी काहीच हरकत नाही. पण, ६ लाख कामांसाठी ६०० कामांची चौकशी करण्यात आली. ती झाली नसती तर बरं झालं असतं. पण, ६०० कामांसाठी पूर्ण योजनाच चुकीची होती, असं म्हणणं बरोबर नाही'', असं फडणवीस म्हणाले.

दरम्यान, जलयुक्त शिवार योजनेवर फडणवीसांवर अनेकदा टीका करण्यात आली. त्यावरही फडणवीसांनी उत्तर दिले असून हा अहवाल म्हणजे सरकारनेच सरकारच्या टीकेला दिलेलं उत्तर आहे, असंही फडणवीस म्हणाले.

गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात कॅगने फडणवीसांच्या जलयुक्त शिवार योजनेवर काही आक्षेप घेतले होते. कॅगच्या अहवालात ४ जिल्ह्यांमध्ये जलयुक्त शिवार योजना अपयशी ठरल्याचे सांगितले होतं. त्यासाठी महाविकास आघाडी सरकारने एसआयटी स्थापन केली होती. आता या समितीचा अहवाल समोर आला असून जलयुक्त शिवार अभियानामुळे राज्यातील भूजल पातळी वाढली असून उपसा वाढला तरी अनेक गावांमध्ये भूजल पातळी स्थिर आहे. तसेच जलयुक्तमुळे पीक पेरणी क्षेत्रात, उत्पन्नात आणि शेतकऱ्यांच्या राहणीमान दर्जातही वाढ झाली आहे, असे सांगण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup, IND vs PAK: भारताने शेवटच्या क्षणी पाकिस्तानशी खेळण्यास नकार दिला तर काय होईल? सुपर-४ मध्ये प्रवेश मिळेल का?

PM-Kisan Samman Nidhi : 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही किसान सन्मान निधीचा २१ वा हप्ता, नवी अपडेट समोर; तुमचं नाव तर नाही ना? असं करा चेक

Pune Crime:'विनापरवाना पिस्तूलाची स्टंटबाजी दोघा मित्रांना भोवली'; तळेगाव एमआयडीसीतील घटना, एक गंभीर जखमी तर दुसरा पोलीस कोठडीत

Pro Kabaddi 12: पुणेरी पलटनचा तेलुगू टायटन्सवर ३९-३३ ने दमदार विजय! गुणतालिकेत गाठलं अव्वल स्थान

Jejuri Theft News: अख्खं गाव चोराच्या पाठीमागे, अखेर पोलिसांच्या जाळ्यात अडकलेच | Sakal News

SCROLL FOR NEXT