mumbai high court sakal
महाराष्ट्र बातम्या

"विनामास्क लोकांकडून वसूल केलेला दंड परत करा"; हायकोर्टात याचिका

त्याचबरोबर लससक्तीविरोधातही या याचिकेत भाष्य करण्यात आलं आहे.

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : विनामास्क फिरणाऱ्या लोकांकडून वसूल केलेला दंड परत करा, अशी मागणी करणारी याचिका मुंबई हायकोर्टात दाखल करण्यात आली आहे. तसेच याचिकाकर्त्यानं राज्य सरकारवर त्यांनी ५ कोटींच्या नुकसान भरपाईचा दावाही दाखल केला आहे. (Return fines on people traveling without masks Petition in Mumbai High Court)

सूत्रांच्या माहितीनुसार, फिरोज मिठबोरवाला यांनी यासंदर्भातील याचिका मुंबई हायकोर्टात दाखल केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलंय की, सरकारनं केलेली लससक्ती रद्द करण्यात यावी. तसेच विनामास्क फिरणाऱ्या लोकांकडून वसूल करण्यात आलेला दंडही परत करण्यात यावा. या दंडापोटी राज्य शासनानं ५ कोटी रुपयांची नुकसान भरपाईही द्यावी, असं या याचिकेत म्हटलं आहे.

दरम्यान, जनतेवर केलेल्या या दंडात्मक कारवाईबद्दल मुख्यमंत्र्यांसह संबंधित सरकारी अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई केली जावी, अशी मागणीही याचिकाकर्ते फिरोज मिठबोरवाला यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shashikant Shinde NCP President : प्रदेशाध्यक्षपदी शशिकांत शिंदे; शरद पवारांच्या पक्षात नेतृत्व बदल

आजचे पंचांग आणि दिनविशेष - 16 जुलै 2025

Shubhanshu Shukla Return : पृथ्वीवर 'शुभ' अवतरण; शुभांशू शुक्ला वीस दिवसांनी परतले

आजचे राशिभविष्य - 16 जुलै 2025

Maharashtra Vidhan Sabha : देसाई विरुद्ध ठाकरे सामना रंगला, सरदेसाईही रिंगणात; सभागृह दहा मिनिटांसाठी तहकूब

SCROLL FOR NEXT