महाराष्ट्र बातम्या

गेल्या ११ महिन्यात राज्यात २ हजार २७० शेतकऱ्यांच्या आत्महत्या

पूजा विचारे

मुंबईः गेल्या ११ महिन्यात महाराष्ट्र राज्यात २ हजार २७० शेतकऱ्यांच्या आत्महत्या झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. शेतकऱ्यांची कर्जमाफी तसेच बऱ्याच योजनेनंतर सुद्धा शेतकऱ्यांची आत्महत्या कमी झालेल्या नाहीत असंच चित्र राज्यात दिसत आहे. 

माहिती अधिकारात मिळवलेल्या माहिती नुसार, एकूण २ हजार २७० शेतकऱ्यांनी १ जानेवारी २०२० ते ३१ नोव्हेंबर २०२० या काळात म्हणजेच मागच्या ११ महिन्यात आत्महत्या केलेल्या आहेत. त्यापैकी फक्त ९२० शेतकऱ्यांना प्रत्येकी एक लाख रुपये महाराष्ट्र सरकार कडून अनुदान मिळालेले आहेत.  २०१९ मध्ये २ हजार ८०८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आणि त्यापैकी १ हजार ५७८ शेतकरी कुटुंबांना एक लाख रुपये अनुदान देण्यात आलं आहे.

मुंबई विभागातल्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा.
 
दरवर्षीप्रमाणे या वर्षीही विदर्भात सगळ्यात जास्त आत्महत्या

दरवर्षीप्रमाणे या वर्षीही विदर्भात सगळ्यात जास्त आत्महत्या झालेल्या आहेत आणि सगळ्यात जास्त शेतकऱ्यांना अनुदान नाकारण्यात आलेला आहे. एकूण ९९० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत त्यात फक्त ३४८ शेतकरी कुटुंबांना अनुदान मिळाले तर तब्बल ४११ शेतकरी कुटुंबांना अनुदान नाकारण्यात आलेला आहे. विदर्भातील यवतमाळ आणि अमरावती जिल्ह्यात सगळ्यात जास्त म्हणजेच २९५ आणि २४८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत.

Right to information Maharashtra farmer more than two thousand farmer ended their life

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Air Ambulance Crash: भीषण विमान दुर्घटना!,रांचीहून दिल्लीला निघालेली 'एअर अ‍ॅम्ब्यूलन्स' घनदाट जंगलात कोसळली

Team India Semi Final Scenario : टीम इंडियाला नेट रन रेट रडवणार! झिम्बाब्वेविरुद्ध ११ षटकं अन् विंडीजविरुद्ध १८३ धावांनी विजय... तिसरं समीकरणही लैय अवघड

Onion Rate Issue : कांदा उत्पादकांना एकरी ५० हजारांचा तोटा; शेतकऱ्यांत बाजारभावाअभावी चिंता, उत्पादन खर्च भागविण्याचाही प्रश्न

Bangladesh Politics : पंतप्रधान तारिक रहमान यांचा मोहम्मद युनूस यांना मोठा धक्का!

Yavatmal News : जिल्हा परिषद कर्मचार्‍यांच्या बदल्या एप्रिलमध्ये होणार; सीईओंचे गटविकास अधिकार्‍यांना पत्र

SCROLL FOR NEXT