WhatsApp-Image-2018-07-18-a.jpg
WhatsApp-Image-2018-07-18-a.jpg 
महाराष्ट्र

नदीला कालव्याचा दर्जा देणे शक्य नाही : शिवतारे

ज्ञानेश्वर बिजले

नागपूर : भीमा नदीकाठच्या गावांतील शेतीसाठी जेव्हा उजनी धरणातून पाणी सोडले जाईल तेव्हा नदीतील कोल्हापूर पद्धतीचे बंधारे भरून घेण्यात यावेत, ही मागणी मान्य करण्यास जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी गुरुवारी नकार दिला. याबाबत आमदार भारत भालके यांनी लक्षवेधी सुचनेद्वारे ही मागणी केली होती. नदीला कालव्याचा दर्जा देणे शक्य नसल्याचे शिवतारे यांनी स्पष्ट केले.

या लक्षवेधी सुचनेवर भालके, विरोधी पक्षनेते विखे पाटील, अजित पवार, गणपतराव देशमुख, भीमराव धोंडे यांनी उपप्रश्‍न विचारले. भालके म्हणाले, ‘‘पुनर्वसन झालेल्या शेतकऱयांना, तसेच पंढरपुरातील सरकोलीसह आजूबाजूला असलेल्या भागात नदीवरील पाण्यावर शेती अवलंबून आहे. सोलापूरला स्वतंत्र जलवाहिनी झाल्यानंतर त्या गावांना पाणी कसे देणार? टाटा कंपनीबरोबर मुळशी व अन्य धरणांबाबत झालेला करार रद्द करून ते पाणी द्यावे.‘‘ 

पवार म्हणाले, ‘‘पुणे व पिंपरी चिंचवडसाठी वीस अब्ज घनफूट (टीएमसी) पाणी लागते. टाटा कंपनीकडून तीनशे मेटावॅट वीज निर्माण होते. मुळशी धरणाची उंची वाढवून 1.2 टीएमसी पाणी मुळा नदीत वळवून घेतले. टाटा कंपनीला तीनशे मेगावॅट वीज अन्य मार्गाने उपलब्ध करून द्यावी. त्यामुळे 15 टीएमसी पाणी उपलब्ध होईल. त्याचा उपयोग उजनी धरण, तसेच दौंड, इंदापूर, हवेली, बारामती येथील शेतीला होईल. त्यामुळे शहर, ग्रामीण भागाचा पाण्याचा वाद संपेल. त्यासंदर्भातील समितीला अहवाल डिसेंबरपर्यंत सादर करावा.‘‘

देशमुख म्हणाले, ‘‘मंगळवेढ्यातील एक हजार एकर जमीन उजनीसाठी दिल्यानंतरही केवळ 15 ते 18 टक्के पाणी मिळते. त्यासाठीचा सर्वांगीण विकास आराखडा (डीपीआर) किती दिवसांत देणार व निधी कधी देणार?‘‘ धोंडे म्हणाले, ‘‘मराठवाड्यासाठी उजनी धरणातून 25 टीएमसी पाणी कधीपासून मिळणार. ‘‘

शिवतारे म्हणाले, ‘‘उजनी धरणाच्या मंजूर प्रकल्प अहवालात सिंचन अथवा पिण्यासाठी पाणी भीमा नदीतून सोडण्याची तरतूद नाही. तथापी सोलापूर महापालिकेची जलवाहिनी अद्याप न झाल्याने उजनी धरणातील वीस टीएमसी पाणी आकस्मित आरक्षण केले होते. ते केवळ पिण्यासाठी असल्याने सिंचनासाठी वापर अपेक्षित नाही. धरणानंतर नदीवर 19 कोल्हापूर पद्धतीचे बंधारे आहेत. त्यावर पंढरपूर, सांगोला, सोलापूर व अन्य ग्रामीण पाणीपुरवठा योजना आहेत. या बंधाऱयावरील सिंचन पावसाचे पाणी अडवून होणे अपेक्षित आहे. शिरढोण, कौठाळी, इसबावी येथील प्रकल्पग्रस्तांना सिंचनासाठी जलवाहिनीद्वारे पाणी देण्यासाठी सर्व्हेक्षण करण्यात येत आहे.''

‘‘कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्पाला लवादाने स्थगिती दिली आहे. नदीवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱयाचे बॅरेजमध्ये रुपांतर करण्यास सातशे कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. त्यामुळे प्रायोगिक तत्त्वावर वडापूर व सीना नदीवरील वडकबाळ येथील बंधाऱयाचे बॅरेजमध्ये रुपांतर करण्याचे ठरले आहे. मंगळवेढा पाणी देण्याबाबत बैठक घेण्यात येईल,‘‘ असे त्यांनी सांगितले.

मुळशी धरणातील पाणी जलविद्युत निर्मितीनंतर ऊर्ध्व भीमा उपखोऱयात वळविण्याबाबत अभ्यासासाठी समिती स्थापन करून त्याचा अहवाल येत्या डिसेंबरपर्यंत सादर करण्यात येईल, असे जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले. पुण्यासाठी 18 टीएमसी पाणी लागते. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड या मोठ्या शहरांसाठी पाणी राखून ठेवावे लागेल. मुळशीतून कोकणात जाणारे पाणी मुंबईला देण्यात येईल. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dharashiv Loksabha election : ...म्हणून ओमराजे निंबाळकर शिंदेंसोबत गेले नाहीत; 'सकाळ'च्या खास मुलाखतीत केला खुलासा

T20 World Cup 2024: BCCI निवड समितीची जय शाह यांच्यासोबत अहमदाबादमध्ये बैठक! टीम इंडियाची घोषणा कधी? अपडेट्स आल्या समोर

Patanjali Products Ban: पतंजलीच्या 14 औषधांवर उत्तराखंडमध्ये बंदी! सुप्रीम कोर्टानं फटकारल्याचा परिणाम

Loksabha election 2024 : बेटों के सम्मान में, 'मर्द' उतरे मैदान मे! ना विजयाची चिंता ना प्रचाराची फिकीर; पुरुषांच्या हक्कासाठी निवडणुकीच्या मैदानात

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

SCROLL FOR NEXT