Amruta fadnavis rupali chaknakar 
महाराष्ट्र बातम्या

"संवेदनाहीन मनाचं, अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी"

अमृता फडणवीस यांनी सरकारवर टीका केली होती.

Amit Ujagare (अमित उजागरे)

पुणे : लखीमपूर घटनेविरोधात मविआ सरकारनं पुकारलेल्या आजच्या महाराष्ट्र बंदवर अमृता फडणवीस यांनी ट्वीटद्वारे सरकारवर टीका केली होती. त्यांच्या या टीकेवर आता राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी शेलक्या शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे. "संवेदनाहीन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी," अशा शब्दांत त्यांनी अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली आहे.

अमृता फडणवीस यांचं ट्वीट शेअर करत रुपाली चाकणकर यांनी म्हटलं, "वहिनींच्या गाण्यात सूरांचा जसा ताळमेळ नसतो तसं त्यांच्या बोलण्यात सुद्धा आजकाल काही ताळमेळ नसतो? संवेदनाहीन मनाचं आणि अर्धवट ज्ञानाचं परफेक्ट कॉम्बिनेशन म्हणजे अमृता वहिनी"

अमृता फडणवीस काय म्हणाल्या होत्या?

लखीमपूर येथे आंदोलक शेतकऱ्यांच्या अंगावर भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांच्या मुलानं गाडी चढवल्याप्रकरणी महाविकास आघाडी सरकारने कॅबिनेटमध्ये ठराव करुन आजच्या दिवशी महाराष्ट्र बंद पुकारला होता. यापूर्वी परमबीर सिंग प्रकरणात राज्य सरकारवर वसूलीचे आरोप झाले होते. तो धागा पकडत आणि आजच्या बंदच्या पार्श्वभूमीवर अमृता फडणवीस यांनी सरकारला टार्गेट केलं. #MaharashtraBandhNahiHai असा हॅशटॅग वापरत "आज वसूली चालू है या बंद?" असा सवाल त्यांनी सरकारला विचारला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Market Yard Traffic Advisory : बाबा आढाव यांच्या अंत्यदर्शनामुळे मार्केटयार्डात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तात्पुरते मार्ग बदल!

‘महाडीबीटी’वरील शेतकऱ्यांच्या अर्जांची पूर्वसंमती बंद! ट्रॅक्टरसह सगळ्याच यंत्रांची थांबली खरेदी; निधीची गरज ३१,८३२ कोटींची अन्‌ आहेत अवघे ११८९ कोटी रुपये

Baba Adhav refused Maharashtra Bhushan honour :...म्हणून बाबा आढाव यांनी नाकारला होता राज्याचा सर्वोच्च सन्मान, ‘महाराष्ट्र भूषण’!

अविश्रांत चळवळ! अखेरपर्यंत श्रमिकांसाठी लढत राहिले, सहा वर्षांपासून 'या' दुर्धर आजाराशी दिला लढा

Pune Airport Road Crash : मद्यधुंद चालकाची बेफाम गाडी; एअरपोर्ट रस्त्यावर तीन वाहनांचा अपघात; विमानतळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल!

SCROLL FOR NEXT