Sachin will return! Dormant hope for the villagers of Vanad
Sachin will return! Dormant hope for the villagers of Vanad 
महाराष्ट्र

सचिन परत येईल! वणंदच्या ग्रामस्थांना सुप्त आशा 

सिद्धेश परशेट्ये

ःखेड - "आमचा सचिन गेलाच नाही, अपघाताची माहिती आम्ही टीव्हीवर पाहिली, परंतु आम्हाला अद्यापही विश्‍वास आहे. सचिन जिवंत आहे' तो परत येईल, अशी सुप्त आशा वणंदमधील ग्रामस्थांनी व्यक्त केली. 

दापोली येथील कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांची सहल महाबळेश्‍वर येथे निघाली होती. जाताना या बसला महाबळेश्‍वर येथील आंबेनळी घाटात अपघात झाला. अपघातात वणंद येथील सचिन गुजर हे कृषी विद्यापीठाच्या बांधकाम विभागात कार्यरत होते. सचिन यांचे काही नातेवाईक या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी जाण्यासाठी निघाले. सचिन यांच्या अपघाती जाण्याने वणंद गावावर शोककळा पसरली आहे.

ही दुर्दैवी घटना टीव्हीवर पाहिली, असे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. परंतु आमचा सचिन या अपघातात गेलाच नाही, अशी आशा सचिनचे चुलते अनंत गुजर यांनी बोलून दाखविली. या अपघाताची माहिती मिळाल्यानंतर गावातील सर्व ग्रामस्थांनी सचिनच्या घराकडे धाव घेतली. त्यांच्या घरी वृद्ध वडील, सचिनची पत्नी व दोन लहान मुले आहेत. सचिन हा पायाने थोडासा अपंग होता. परंतु त्याने त्याचे अपंगत्व त्याच्या कामाच्या कधीही आड येऊ दिले नाही.

गावातही सचिन खूपच कृतिशील होता. गावच्या अमर विचार मंडळाचा तो उपाध्यक्ष होता. गावच्या सर्वच कार्यक्रमामध्ये तो हिरिरीने सहभागी होत असे. आज पहाटे सहलीला जाताना पत्नी व वडिलांना तो उद्या (ता. 29) परत येईन असे सांगून गेला होता, अशी माहिती सचिनचे चुलते अनंत गुजर यांनी दिली. सचिनचा चुलत भाऊ अविनाशला ही घटना समजल्यानंतर तो तत्काळ काही मित्रमंडळींना घेऊन घटनास्थळी गेला आहे. या संदर्भात गावातील काही ग्रामस्थांना विचारले तर त्यांनी सांगितले, की अद्यापही प्रशासनाने तो मृत पावला असे जाहीर केले नाही. त्यामुळे आमचा सचिन अद्यापही जिवंत आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT