BJP-Congress-NCP-Sena e sakal
महाराष्ट्र बातम्या

Sakal Survey : महाविकास आघाडीने निवडणूक लढल्यास भाजपला धक्का?

भाग्यश्री राऊत

मुंबई : गेल्या दोन वर्षांपूर्वी २८ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. हे तीन पक्षांचं सरकार असल्याने जास्त काळ टिकणार नाही असा दावा विरोधकांनी वारंवार केला आहे. मात्र, सरकारने यशस्वीपणे दोन वर्ष सत्तेत पूर्ण (2 years of Maha Vikas Aghadi) केली आहेत. ठाकरे सरकारच्या द्विवर्षपूर्तीनिमित्त 'सकाळ-साम'ने एक सर्वेक्षण (Sakal Saam Survey) केलंय. त्यामधील निकाल चकीत करणारे आहेत.

राज्यभरात सर्व २८८ विधानसभा मतदारसंघातून सॅम्पल सर्व्हे करण्यात आला. याशिवाय २८८ मतदारसंघात गट चर्चाही घेण्यात आल्या आहेत. तसेच या सर्व्हेसाठी २०१९ मध्ये झालेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी मतदान केलेल्या मतदारांची निवड करण्यात आली. हे सॅम्पल निवडताना शहर, ग्रामीण आणि निमशहरी असा समतोल राखला असून महापालिका हद्दीतूनही सॅम्पल निवडण्यात आले. तसेच शिक्षण, आर्थिक, सामाजिक, लिंग, वय हे सर्व निकष लक्षात घेऊन हा सर्व्हे करण्यात आला.

महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष एकत्र लढल्यास १७८ जागा मिळणार, तर भाजपला धक्का बसणार आहे. कारण भाजपच्या जागांमध्ये कमालीची घट होताना पाहायला मिळतेय. महाविकास आघाडी हे काँग्रेसशिवाय निवडणूक लढले तर महाविकास आघाडीला फक्त ३५ जागा मिळतील. भाजपला फक्त ६६ जागा मिळणार असं या सर्वेक्षणातून दिसतंय. त्यामुळे आता महाविकास आघाडी विरोधात भाजप अशी निवडणूक झाली तर भाजपला पराभवाचा सामना करावा लागणार आहे, असंच या सर्वेक्षणातून दिसतंय.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Atal Setu EV Toll Waiver : इलेक्ट्रिक वाहनांना अटल सेतूवर आजपासून टोलमाफी; पुणे-मुंबई एक्सप्रेस वे आणि 'समृद्धी' वरही दोन दिवसांत लागू

Chandrakant Patil : व्हिजन ठेवल्यास समाजाचा सर्वांगीण विकास, मंत्री चंद्रकांत पाटील यांचा सल्ला; ‘सकाळ प्लस स्टडीरूम’च्या ई-पेपरचे प्रकाशन

Shivaji Maharaj : शिवाजी महाराजांच्या काळात कॉफी खरंच होती का? डच पाहुण्यांना नेमका कसा केला होता पाहुणचार?

शेतकऱ्यांच्या डाेळ्यात पाणी! 'सातारा जिल्ह्यातील शंभर हेक्टरवरील पिकांना फटका': अतिवृष्टीत खरीप पिकांचे मोठे नुकसान

Satara child health: 'साताऱ्यात लहान मुलांमध्ये वाढले संसर्गजन्य आजार'; सर्दी, खोकला, ताप, जुलाबाचे रुग्ण

SCROLL FOR NEXT