Sambhaji Bhide टिम ई सकाळ
महाराष्ट्र बातम्या

वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयावर संभाजी भिडे आक्रमक

राज्य सरकारचा निर्णयाविरोधात संभाजी भिडे यांचे सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांना निवेदन

सकाळ डिजिटल टीम

सांगली : राज्य सरकारने सुपरमार्केट (Super Market) आणि वॉक-इन स्टोअरमध्ये वाईन (Wine) विक्रीला परवानगी देण्याच्या निर्णयावर गुरवारला मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्कामोर्तब करण्यात आलाय. मात्र या निर्णयावर भाजपसह अनेकांनी विरोध दर्शवलाय. यातच या निर्णयावर शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे आक्रमक झाले आहेत.

राज्य सरकारचा हा निर्णय अत्यंत दुर्दैवी, समाज आणि राष्ट्राच्या दृष्टीने घातक आहे. संपूर्ण मंत्रिमंडळाने संभाजी महाराजांच्या पायाशी नतमस्तक होऊन माफी मागावी अशी मागणी संभाजी भिडे यांनी केली आहे. सोबत हा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अन्यथा उद्रेक अटळ आहे, असा इशारा सुध्दा भिडे यांनी दिलाय.

राज्य सरकारचा या निर्णयाविरोधात संभाजी भिडे यांच्या नेतृत्वाखाली आज सांगलीचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत चौधरी यांना निवेदन देण्यात आले. महाराष्ट्र सरकारने दुकाने आणि मॉलमध्ये वाईन विक्रीचा घेतलेला निर्णय अत्यंत दुर्देवी असून नितीमत्तेचा संहार करणारा आहे, असं मत भिडे यांनी निवेदनातून व्यक्त केलंय. राज्य सरकारने याची गांभीर्याने दखल घेत हा निर्णय मागे घ्यावी, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, असे भिडे म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ayush Komkar Case: आयुष कोमकर खून प्रकरणात कोर्टामध्ये काय घडलं? बंडू आंदेकरचे पोलिसांवरच आरोप

Pune Traffic Issue : वाहतूक अडथळ्यांच्या कारणांचा अहवाल सादर करा; आयुक्तांचा आदेश

Sachin Yadav: नीरजलाही मागे टाकणारा कोण आहे सचिन यादव? पोलिस भरतीनंतर भालाफेक सोडण्याचा केलेला विचार, पण...

Latest Maharashtra News Updates : प्राध्यापकाने केली विद्यार्थिनीची छेडखानी, तक्रार करुनही कारवाई नाही

Mamata Banerjee: ८४० कैदी तुरुंगातून मुक्त! विधानसभा निवडणुकीपूर्वी ममता बॅनर्जी यांचा निर्णय, नेमकं कारण काय?

SCROLL FOR NEXT