महाराष्ट्र विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन आजपासून सुरू झाले. या अधिवेशनामध्ये अनेक विषय मांडले जाणार. हे अधिवेशन वादळी ठरेल, असा बोलबाला विरोधी पक्षांकडून केला जातोय. यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. आदड आपट करून वादळी अधिवेशन होत नाही, असे ते म्हणाले. अधिवेशन सुरु होण्यापूर्वी ते माध्यमांशी बोलत होते.
संजय राऊत म्हणाले, “आदड आपट करून वादळी अधिवेशन होत नाही. वादळ अडीच वर्षांपूर्वी आले. त्यामुळे कसलं वादळ निर्माण करणार? कुठेतरी फुंकर मारल्याने अशी वादळ येत नाही. दिल्लीतील राज्यसभेत संसदीय लोकशाहीला किंमत नसेल मात्र महाराष्ट्रातील विधानसभेला मोठी परंपरा आहे त्यानुसार विरोधी पक्षाने काम करावे.”
राज्यातील मुख्यमंत्री हे राजकीय सामाजिक कार्यक्रमात सहभाग घेत आहेत. भविष्यात ते महाराष्ट्रभर फिरणार आणि महाविकास आघाडी भक्कम करणार असल्याचेही राऊत माध्यमाशी बोलताना म्हणाले.
यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक देखील होणार असल्याची दाट शक्यता आहे. याकरीता राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना राज्य सरकार पत्र लिहणार आणि त्यांनतर ही निवडणूक पार पडेल. सोबतच या अधिवेशनात प्रस्तावित विधेयके व अध्यादेश यासह प्रलंबित विधेयकेसुध्दा मांडली जातील.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.