Sanjay Raut Eknath Shinde Devendra Fadnavis Sakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut : 'शासन आपल्या दारी अन् आम्ही दिल्ली दरबारी'; राऊतांची शिंदे-फडणवीसांवर खोचक टीका

सकाळ डिजिटल टीम

कोल्हापूर : राज्य सरकारच्या मंत्रीमंडळाचं खातेवाटप आज पार पडलं. यावरून सत्ताधाऱ्यांमध्ये 'कही खुशी कही गम', अशी स्थिती आहे. त्याचं कारण म्हणजे अनेक नेत्यांची मंत्रीपदे ही नवीन मंत्र्यांना देण्यात आली आहे. तसेच मंत्रीमंडळ विस्तार होत नसल्यानेही शिंदे गटातील काही नेते नाराज असल्याचा दावा करण्यात येतोय. यावरून संजय राऊत यांनी सत्ताधारी पक्षावर टीका केली आहे.

मला कोणी तरी सांगितलं की, सरकार नाशिकमध्ये येणार आहे. सरकार आपल्या दारी आणि आम्ही दोघे दिल्लीच्या दरबारी अशी अवस्था सरकारची असल्याचा टोलाही राऊत यांनी एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांना लगावला.

अजित पवार यांचं राजकारणात वजन आहे. त्यांचे आणि आमचे राजकीय मतभेद आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयाशी आम्ही सहमत नाही. ज्या पद्धतीने त्यांनी भाजपला सत्ता मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले, ते महाराष्ट्राला पसंत पडलेलं नाही, असही राऊत म्हणाले.

शेवटी राजकारणात कोण कशी सौदेबाजी करतो, त्याच्यावर मलई वगैरे मिळत असते. वर्षभर इतरांनी मलई खाल्ली. आता त्यांना वाटेकरी आले आहेत. त्यांच्यात स्वाभिमान असेल तर त्यांनी सरकरामध्ये राहता कामा नये, असा टोला राऊत यांनी शिंदे गटाला लगावला. तसेच त्यांची अवस्था फार गंभीर झाली असून सत्तार यांचं मंत्रीपदही जाईल, असा दावा राऊत यांनी केलं.

दरम्यान अजित पवार उत्तम अर्थमंत्री होते. त्यांनी आर्थिक शिस्त आणि आर्थिक घडी बसवण्याचा प्रयत्न केला. वर्षभरात बेफाम उधळपट्टी झाली, त्याला अजित पवार यांच्यामुळे चाप बसेल असंही राऊत म्हणाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon News : जळगाव महापालिकेत लाचखोरीचा पर्दाफाश; लिपिक व समन्वयक एसीबीच्या जाळ्यात

Rajiv Gandhi : अन् राजीव गांधी मुंबईतून गेले ते कायमचेच! राजभवनातील माजी अधिकाऱ्याने सांगितली शेवटच्या भेटीची आठवण

Rain-Maharashtra Latest Live News Update: हिंगोलीत येलदरी धरणातून विसर्ग सुरू झाल्याने सिद्धेश्वर धरणाचे 4 दरवाजे उघडणार

Beed Crime: सुरेश धस यांचे कार्यकर्ते आहोत, असं म्हणत एकाला बेदम मारहाण; शिरुरमध्ये नेमकं काय घडलं?

Jalgaon Crime : जळगावात कौटुंबिक वादातून धक्कादायक घटना; पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला करत संपवले जीवन

SCROLL FOR NEXT