Sanjay Raut News
Sanjay Raut News esakal
महाराष्ट्र

संदीपान भुमरेंनी माझ्यासमोर लोटांगण घातलं; संजय राऊतांचं टीकास्त्र

सकाळ डिजिटल टीम

मुंबई : आगामी काळात पक्षाला पूर्ण प्रतोदाची गरज आहे. त्यामुळं राजन विचारे लोकसभेत शिवसेनेचे प्रतोद असणार आहेत. ईडीच्या माध्यमातून नेत्यांवर दबाव टाकला जात आहे. तसंच जितेंद्र नवलानी यांची चौकशी थांबवणं दुर्दैवी असल्याचं मत खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी व्यक्त केलं. ते माध्यमांशी संवाद साधत होते. यावेळी त्यांनी बंडखोर आमदार संदीपान भुमरेंचाही चांगलाच समाचार घेतला. (Sanjay Raut News)

ते पुढं म्हणाले, जितेंद्र नवलानी (Jitendra Navlani) यांची चौकशी का सुरु होती आणि ती का थांबवली हे चौकशी करण्याचे आदेश देणाऱ्यांनी लोकांना सांगायला हवं. मी या गोष्टीवर जास्त बोलणार नाहीय. कारण, हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. आधीच्या सरकारनं चौकशी का लावली आणि त्याची कारणं काय होती, हे देखील समजायला हवं. आनंदराव आडसूळ यांच्यावरही दबाव होता, असंही त्यांनी स्पष्ट केलं.

बंड करणाऱ्यांनी आधी बंडामागचं नेमकं कारण काय होतं हे ठरवावं. शिवाय, बंडखोरांनी जनतेला गोंधळात टाकू नये, असंही त्यांनी म्हटलंय. पक्ष का सोडला यासाठी त्यांनी कार्यशाळाही घेतली पाहिजे. 2014 साली आम्ही हिंदुत्वाच्या मुद्द्यावरच निवडून आला होतो. मात्र, भाजपनं आमच्यासोबतची युती तोडली. मग, यावर कोणीच काही बोललं नाही. भाजपनं आपला शब्द फिरवला म्हणून आमच्यावर ही वेळ आलीय. मी व्यक्तीश: सरकारी कामात पडलो नाहीय, असंही त्यांनी स्पष्ट केलं. बंडखोरी पूर्वी संदीपान भुमरेंनी माझ्यासमोर लोटांगण घातलंय. सामना कार्यालयामध्ये साहेब, तुम्ही होतात म्हणून हे सरकार आलं आणि आम्ही मंत्री झालो, असं त्यांनी म्हटलं. हवं तर त्याचे व्हिडिओ आणि फोटोही मी आपल्या समोर सादर करु शकतो, असं ते म्हणाले.

मुंबई पोलिसांनी नवलानी प्रकरणाची एसआयटी चौकशी गुंडाळली

ईडी अधिकाऱ्यांसाठी खंडणी वसूल करत असल्याचा आरोप असलेले जितेंद्र नवलानी यांची एसआयटी चौकशी बंद करण्यात आलीय. राज्य सरकारनं मुंबई उच्च न्यायालयात ही माहिती दिली. शिवसेना नेते संजय राऊत यांनी व्यवसायिक जितेंद्र नवलानी यांच्यावर खंडणी वसुलीचे आरोप केले. त्यानंतर राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना एसआयटी चौकशी सुरू करण्यात आली होती.

मुंबईतील व्यावसायिक जितेंद्र नवलानी हा ईडी अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करून बिल्डरांकडून वसुली रैकेट चालवत असल्याचा संजय राऊत यांनी आरोप केला होता. वर्ष 2015 ते 2021 दरम्यान नवलानी यांनी ईडी अधिकाऱ्यांच्या नावाचा वापर करत जवळपास 58.96 कोटी खंडणी म्हणून वसूल केल्याचा आरोप संजय राऊत यांनी केला होता. जितेंद्र नवलानी हे भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचे निकटवर्तीय असल्याचा आरोप करण्यात येत होता. या आरोपांची चौकशी करण्याकरिता मुंबई पोलिसांचे (Mumbai Police) एक विशेष पथक तयार करण्यात आलं होतं. या प्रकरणात अँटी करप्शन ब्युरोनं मे महिन्यात गुन्हा दाखल केला होता. एसबीकडून जितेंद्र नवलानीविरोधात लूक आउट नोटीस जारी केली होती. बुधवारी मुंबई हायकोर्टात न्या. नितीन जमादार आणि न्या. एन. आर. बोरकर यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी झाली. त्यावेळी सरकारी वकील अॅड. अरुणा पै यांनी एसआयटी चौकशी बंद करण्यात आली असल्याची माहिती दिली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Gautam Gambhir: 'KKR जिंकल्यावर गंभीरचे कौतुक अन् हरल्यावर श्रेयसची चूक?' दिग्गज क्रिकेटरच्या पोस्टने उडवली खळबळ

Radhika Kheda: "मला मद्य पिण्याची ऑफर दिली अन् कार्यकर्ते..."; राधिका खेरांचा काँग्रेसच्या भारत जोडो यात्रेवर गंभीर आरोप

Artificial Intelligence in Business: चक्क ९४ टक्के भारतीय प्रोफेशनल्स करतात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर, काय आहे कारण ?

The Family Man 3: प्रेक्षकांसाठी खुशखबर! 'द फॅमिली मॅन 3'बद्दल मनोज बाजपेयींनी दिली मोठी अपडेट

Lok Sabha 2024: मतदान केंद्रांना नायलॉनच्या जाळ्यांचे कवच, 101 वाघ असलेल्या जंगलात असं पार पडणार वोटींग

SCROLL FOR NEXT