Sanjay Raut  esakal
महाराष्ट्र बातम्या

Sanjay Raut : ..तेव्हापासून महाराष्ट्र जातीपातीत वाटला गेला ; राऊतांचा खळबळजनक दावा !

Chinmay Jagtap

Sanjay Raut : ‘देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री झाल्यापासून महाराष्ट्र जातीपातीत वाटला गेला,’’ असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना केला.

सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यात धार्मिक मुद्द्यांवरून दोन समाजांत संघर्ष झाला. राज्यात विविध ठिकाणी सामाजिक अशांतता आहे. यावरून राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. महाराष्ट्रातील वातावरण असे कधीच नव्हते.

अस्थिर आणि असुरक्षित जातीपातींमध्ये वाटलेले सध्याचे वातावरण आहे. या सर्वाला भारतीय जनता पक्ष जबाबदार आहे. राज्याला यशवंतराव चव्हाण, बाळासाहेब ठाकरे यांनी एकसंध ठेवले. परंतु, गेल्या दहा वर्षांत या परिस्थितीत बदल झाला आहे. जाती-धर्मानुसार महाराष्ट्राचे तुकडे पडत आहेत, अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

देवेंद्र फडणवीस राज्य मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत आम्ही धनगरांना आरक्षण देऊ असे सांगत होते. हेच फडणवीस महाविकास आघाडीचे अडीच वर्षे सरकार असताना आमची सत्ता आली तर मराठा समाजाला २४ तासांत आरक्षण देऊ, असे सांगत होते. मग फडणवीस आता आरक्षण का देत नाहीत?

- संजय राऊत, खासदार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Elderly Woman Property Fraud: ‘ज्येष्ठ महिलेला न्यायासाठी वणवण फिरवू नका!’ ; मुंबई उच्च न्यायालयाकडून पोलिसांना तपासाचा आदेश

Government Job Fraud: सरकारी नोकरीचे आमिष दाखवून सुशिक्षित बेरोजगार तरुणाची २० लाखांची फसवणूक

''...तर मी जीव देईन'' २०१२ मध्ये निवडणुकीपूर्वी मनमोहन सिंग असं का म्हणाले होते? माजी निवडणूक आयुक्तांकडून धक्कादायक खुलासा

संस्कृतच्या विद्यार्थ्यांना दहावीनंतर होता येणार डॉक्टर! साडेसात वर्षांचा नवा अभ्यासक्रम, संस्कृत विद्यापीठाचा निर्णय

Maharashtra Saint Tradition: संत आणि वारीमुळेच महाराष्ट्राची अस्मिता टिकली; सकाळच्या व्याख्यानमालेत डॉ. सदानंद मोरे यांचे प्रतिपादन

SCROLL FOR NEXT