Sanjay Raut on Rajya Sabha Election | Sanjay Raut News
Sanjay Raut on Rajya Sabha Election | Sanjay Raut News esakal
महाराष्ट्र

सुहास कांदेंचं मत बाद करण्यासाठी मुंबईतून दिल्लीला फोन - संजय राऊत

वैष्णवी कारंजकर

शिवसेना खासदार संजय राऊत सध्या आदित्य ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्यानिमित्त अयोध्येमध्ये आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना एक मोठं विधान केलं आहे. शिवसेनेच्या सुहास कांदेंचं मत बाद करण्यासाठी मुंबईतून दिल्लीला फोन गेल्याचा दावा त्यांनी केला आहे. तसंच न्यायालयापासून निवडणूक आय़ोगापर्यंत प्रत्येक यंत्रणा प्रचंड दबावाखाली असल्याचा दावाही त्यांनी केला आहे. (Sanjay Raut on Rajyasabha Election 2022)

माध्यमांशी बोलताना संजय राऊत (Sanjay Raut) म्हणाले, राज्यसभा निवडणुकीतही केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करण्यात आला. सुहास कांदेंचं (Shivsena MLA Suhas Kande) मत बाद करण्यापासून अनेक प्रकार या निवडणुकीत करण्यात आले. न्यायालयापासून निवडणूक आयोगापर्यंत प्रत्येक यंत्रणा स्वतंत्रपणे काम करू शकत नाही, प्रचंड दबावाखाली आहे. शिवसेनेचं मत बाद करण्यासाठी सात तास लावले. दिल्लीतून आदेश आणला, त्याची माहिती आमच्याकडे आहे. मुंबईतून कोण बोलत होतं, काय सूचना होत्या, याची सगळी माहिती माझ्याकडे आहे".

जे लोक परखडपणे बोलतात, भूमिका मांडतात, अशा सगळ्यांना केंद्रीय तपास यंत्रणा त्रास देतायत. राजकीय सूड, बदला, द्वेष या भावनेतून होतंय. राहुल गांधींची गेले तीन दिवस रात्री १२ पर्यंत चौकशी सुरू आहे. हे प्रकार अजून काही दिवस होत राहतील. ही हुकूमशाहीची सुरूवात नव्हे, हुकुमशाहीचं टोक आहे. आपल्या राजकीय विरोधकांना जुलमी पद्धतीने संपवण्याचं काम हिटलरनेही केलं नसेल. ज्या देशाच्या लोकशाहीचे दाखले जगभरात दिले जातात, त्या देशात लोकशाहीचा गळा घोटण्याचं काम सुरू आहे. हा स्वातंत्र्याचा पराभव आहे. तो भाजपाच्या नेतृत्वाखाली होतोय. त्यामुळे आता पुन्हा एकदा स्वातंत्र्याची लढाई करावी लागणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT