Sanjay Raut 
महाराष्ट्र बातम्या

आमच्या मित्रपक्षांनीही अयोध्येला यावे : संजय राऊत

सकाळवृत्तसेवा

मुंबई : राज्यातील महाविकासआघाडी सरकारला 100 दिवस पूर्ण झाल्यानिमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अयोध्येला जाणार आहेत. माझे असे मत आहे, की आमच्या मित्रपक्षांनीही अयोध्येला यावे, असे मत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी म्हटले आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुन्हा एकदा अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या 100 दिवसपूर्तीला उद्धव ठाकरे अयोध्येत जाऊन श्रीरामाचे दर्शन घेणार असल्याची माहिती राऊत यांनी दिली. 29 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात शिवसेनेने राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस पक्षांच्या पाठिंब्यावर राज्यात सत्तास्थापन केली. उद्धव ठाकरे यांनी शिवाजी पार्क येथे मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. मार्च महिन्यात या सरकारला 100 दिवस पूर्ण होतील. त्यानंतर उद्धव ठाकरे अयोध्येत श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहेत. गेल्या वर्षी लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप-शिवसेना युतीला मोठे यश मिळाले होते. राज्यातील 48 जागांपैकी भाजपने 23, तर शिवसेनेने 18 जागा जिंकल्या. त्यानंतर उद्धव ठाकरे अयोध्या दौऱ्यावर गेले होते. 15 जून 2019 रोजी उद्धव यांचा अयोध्या दौरा पार पडला. त्याआधी 25 नोव्हेंबर 2018 रोजी उद्धव ठाकरे अयोध्येला गेले होते. 

याविषयी बोलताना संजय राऊत म्हणाले, की राज्याचे मुख्यमंत्री हे उद्धव ठाकरे आहेत. त्यामुळे अयोध्येत जाऊन प्रभू श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी जाणार आहोत. महाराष्ट्र सरकारला 100 दिवस पूर्ण होत असल्यानिमित्त आम्ही तेथे जात आहोत. सरकारमधील आमच्या मित्रपक्षांनीही आमच्यासोबत यावे. राहुल गांधीही मंदिरात जाऊन पूजा करतात. त्यामुळे त्यात काय चूक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Rahul Gandhi Video : ''भारतात तुम्ही मला सुरक्षा देऊ शकत नाही का?'', राहुल गांधींची पोलिसांबरोबर बाचाबाची, नेमकं काय घडलं? पाहा VIDEO

Mumbai Health Report: राज्यात पावसाळी आजारांचा कहर; मुंबईत सर्वाधिक रुग्णांची नोंद

ब्रिटिशांच्या १८८१ व करवीर संस्थानच्या १९०२ च्या गॅझेटिरमध्ये मराठा व कुणबी एकच, तरीही मराठा समाजाला झगडावं लागतय; कोल्हापुरात आंदोलन पेटणार

Indira Ekadashi 2025: पूर्वजांना मुक्त करण्यासाठी महिलांनी काय करू नये, जाणून घ्या नियम

Latest Marathi News Updates : परतीच्या पावसामुळे पाणीपातळीत वाढ, मुंबईतील धरणांत ९८.८२ टक्के पाणीसाठा

SCROLL FOR NEXT